Jayesh Gujrati's Blog (in Marathi): AAI

Search

Showing posts with label AAI. Show all posts
Showing posts with label AAI. Show all posts

Tuesday, February 26, 2013

माँ...


एक माँ थी जिसका एक लड़का था, बाप मर चुका था। माँ घरो में बर्तन मांजती थी बेटे को अपना पेट काटकर एक अच्छे अंग्रेजी स्कूल में पढ़ाती थी। एक दिन स्कूल में किसी बच्चे ने उसके लड़के के आँख में पेंसिल मार दी, लड़के की आँख चली गई। डाक्टर ने कहा ये आँख नहीं बचेगी दूसरी लगेगी। तो माँ ने अपने कलेजे के टुकड़े के लिए अपनी एक आँख दे दी। 


अब वो देखने में भी अच्छी नहीं थी। बेटा उसको स्कूल आने को मना करता था क्योंकि वो देखने में अच्छी और पढ़ी लिखी नहीं थी ऊपर से एक आँख भी नहीं रही, उसे अपनी माँ पर शर्म आती थी, कभी लंच बॉक्स देने आती भी थी तो मुह छुपा कर और अपने को नौकरानी बताती थी। अपने बच्चे की ख्वाइश पूरी करने को वो दिन रात काम करती लेकिन बेटे को कमी महसूस नहीं होने देती।

बेटा जवान हुआ, एक  सरकारी अधिकारी बना उसने लव मैरिज की। उसने अपनी माँ को भी नहीं बुलाया और अलग घर ले बीबी के साथ रहने लगा माँ बूढी हो रही थी बीमार भी रहने लगी। लेकिन लड़का अपनी पत्नी और हाई सोसाइटी में व्यस्त रहने लगा उसे माँ की याद भी नहीं आती थी।
 

माँ बीमार रहती लेकिन दिन रात अपने पुत्र की सम्रद्धि और उन्नति के लिए भगवान् से दुआ  मांगती रहती कुछ पडोसी माँ का ख्याल रखते। एक बार वो बहुत बीमार पड़ी तो उसने अपने बेटे को देखने की इच्छा जाहिर की लोग लड़के को बुलाने गए तो, वो अपनी बीबी के साथ कहीं टूर पे घुमने जा रहा था वो नहीं आया उसने कुछ पैसे इलाज़ के लिए भेज दिए, लेकिन माँ का इलाज़ तो उसका बेटा था जिसको मरने से पहले देखना चाहती थी उसे प्यार देना चाहती थी, वो फिर भी बेटे का इन्तेजार करती रही, उसके कलेजे का टुकड़ा उसके आशाओं के टुकड़े कर रहा था। 

वो आया लेकिन तब तक माँ मर चुकी थी उसके हाथ में एक फोटो था लड़के का वही बचपन की स्कूल ड्रेस बाला फोटो धुन्दला गन्दा सा जिसे हर वक्त सीने से लगाये रहती थी, आज भी सीने से लगाये थी, लेकिन मरते दम तक वो अपने कलेजे के टुकड़े को कलेजे से न लगा सकी।

दिन बीते वक्त बदला लड़के का कार से एक्सिडेंट हुआ इस एक्सिडेंट में उसकी दोनों आँख चली गई चेहरे पर चोट लगने से कुरूप लगने लगा दोनों पैर बेकार हो गए चलने में लचार हो गया। पत्नी अमीर घर की लड़की थी, वो दिनों दिन पति से दूर होने लगी क्योंकि पति अब भद्दा और विकलांग था, और एक दिन वो पति को छोड़ कर चली गई। 

तब बेटे को माँ की याद आयी ,की कैसे उसने अपने बेटे के लिए अपनी एक आँख दे दी जीवन के आखरी समय तक वो उसकी फोटो को सीने से लगाये रही, और वो उसको अपनी पत्नी और हाई सोसाइटी के लिए माँ को याद भी नहीं करता था आज ईश्वर ने उसे बता दिया की माँ का प्यार असीम होता है, निस्वार्थ होता है, दुनिया में उससे ज्यादा प्यार करने बाला कोई नहीं ,वो लेटे लेटे यही सोंच रहा था और रो रहा था की ईश्वर ने शायद माँ के प्यार की क़द्र न करने की सजा दी लेकिन शायद माँ स्वर्ग में भी उसकी इस हालत को देख तड़प उठी होगी 

"माँ" जीवन का अनमोल और निस्वार्थ प्यार है किसी और के प्यार के लिए उसे मत ठुकराना।

 

Friday, February 22, 2013

"अनाथ"

यहीं कहीं, कहीं गहरे सन्नाटे में, ख़ामोश निगाहों ने कुछ कहना चाहा 
लफ्ज न थे जुबान पर, तो बस आँखों  ने ही कुछ समजना चाहा । 

नन्हे हाथों ने उंगली थाम चलना चाहा
नाजुक कदमो ने आगे बढ़ाना चाहा,
रो-रो कर जिद को मनवाना चाहा,  
माँ के हाथों से निवाला और बाबा का दुलार चाहा,
बस अपने लिए छोटा-सा आशियाना चाहा । 

 
पलको ने छुप-छुप कर सब कुछ कहना चाहा,
फिर ना समझ दिल को समझाना चाहा,
आंसू पोछ कर मुस्कुराना चाहा,
कभी मन मार कर सिसक-सिसक कर रोना चाहा,
बस माँ की ममता और बाबा का दुलार चाहा । 

लोरी सुन रातों को सोना चाहा,
गलतियों पर फटकार, फिर आँचल में छुपना  चाहा,
 ममता की धरा मैं बहना, और अमृत को पीना चाहा,
बाबा का हाथ सर पर, और अभिमान से जीना  चाहा । 

उस अहसास को पाना चाहा,
जन्नत मैं जीना चाहा,
खुद को महफूज रखना चाहा,
रूठी माँ को मनाना चाहा,
बाबा के लिए कुछ बनना चाहा । 

पर बेखबर थे जिस सच से, दुनिया ने हमें उससे मिलाना चाहा 
बस... एक लफ्ज , और जिंदगी ने खुद को कोसना चाहा 
जब "अनाथ" कहकर, सबने हमारा दिल दुखाया
जाने क्यूँ हमें इतना रुलाया, फिर इस दिल ने खुद को तनहा पाया...
और खुद से रूठकर  बस...
बस...  ख़ामोश रहना चाहा । 



- by पूनम चौधरी, नासिक 
(या कवितेला "Rainbow Youth Festival 2012" मध्ये "First Prize" मिळाले होते। ) 


 

Tuesday, April 03, 2012

आई तू का ग सोडून गेली मला...

आई तू का ग सोडून गेली मला ..
हे जग खूप वाईट आहे जगू देत नाही एकट्याला..
मला सतत तुझी आठवण येते एका एका क्षणाला..
कोणीच नाही ग तुज्या पिल्लाचे अश्रू पुसायला..
खूप खूप रडतो रात्री घेऊन उशीला.....
आई तू का ग सोडून गेली मला ..
ये न ग मला कुशीत कुशीत घ्यायला..
माझे बाळ खूप हुशार म्हणायला....
ये न ग मला घास भरवायला ..
एक घास चिऊ चा म्हणत खाऊ घालायला..



आई तू का ग सोडून गेली मला ..

कोणीच नाही इथे मला ओरडायला..
बाळा अभ्यास कर म्हणून सांगायला ..
कोणीच नाही इथे माझ्याशी खेळायला..
पाय दुखल्यावर दाबून द्यायला...



आई तू का ग सोडून गेली मला ..

न icecream खावसे वाटते ना हि केक
कोणीच नाही माझे लाड पुरवायला ...
कसे कसे होते ग रोज झोपताना..
कोणीच नाही पाठीवरून हात फिरवायला..


Tuesday, March 27, 2012

औषधं

मुलगा नुकताच ऑफिस मधून थकून घरी आलेला. त्याच्या वडिलांना दम्याचाआजार असतो, ते विचारतात “बेटा माझे औषधं आणली काय, काल पासून संपली आहेत.” … …

मुलगा : “मी आज खूप थकून आलोआहे, मी उद्या घेवून येईन.”
 
 बाप: “ठीक आहे बेटा तू आराम कर, खूप थकला असशील..!”

(रात्री अचानक त्याच्या वडिलांना त्रास सुरु होतो… घरी औषधं नसल्यानं त्यांना दवाखान्यात नेई पर्यंत त्यांचा मृत्यू होतो…)


काही दिवसांनंतर मुलाला त्याच्या रूम ची सफाई करतांना जुनी डायरी सापडते. ती त्याच्या वडिलांची असते.

त्यात त्याला ३० वर्ष अगोदरची एक लिहिलेली नोंद सापडते, ती असते..  “आज माझ्या सोन्याला ताप आला होता, ‘Taxi’ न मिळाल्यामुळे व दवाखान्याची लिफ्ट बंद असल्यामुळे त्याला खांद्यावर नेतांना थोडा त्रास झाला, पण माझं बाळ आता शांत झोपी गेला आहे.." (वेळ : रात्री २ वाजता..)

त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण … आता सर्व संपले होते.

प्लीज नेवर हर्ट युअर पॅरेंटस… व्हाटेवर यु आर… इज ओन्ली बिकोझ ऑफ देम…!
by: एक एकटा एकटाच

Monday, March 26, 2012

Servants

"कोल्हापूर जवळील एका छोट्या खेड्या मध्ये न शिकलेले आई वडील शेतामध्ये मोलमजुरी करून आपला संसार चालवीत होते, पण मुलाने मात्र भरपूर शिकून मोठे व्हावे, ह्यासाठी त्याला मुंबई मधील महाविद्यालायात शिक्षणास पाठवितात ......  
 काही दिवसांनी आपल्या मुलाला भेटायला ते दोघे मुंबईला जातात व जाताना मुलाच्या आवडीची आईच्या हाताची चटणी-भाकर ते घेऊन जातात.  
महाविद्यालयात गेल्यावर त्यांना अतिशय साध्या कपड्यांमध्ये बघून त्या मुलाची प्रेयसी विचारते 
"Who are they ?
मुलगा म्हणतो
"They are the servants from my village !!!" ते 
ऐकून आई वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतात ... 
का?  तर आपलां मुलगा इंग्रजी बोलायला लागला म्हणून... 
 
BY: एक एकटा एकटाच
 

Thursday, March 22, 2012

नाती रक्ताची



लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो|
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो|
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे|
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे|

लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो|
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो|
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली|
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली|
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे|
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे|

तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो|
ओवळणी द्यायच्या आधी ताईला खूप चिडवायचो|
कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो|
मात्र अजूनही ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो|
ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे|
राखीच्या धाग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे|

लहानपणी धाकटयावर दाद्ागिरी करायचो|
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो|
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला|
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला|
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे|
भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे|

कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा|
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा|
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो|
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो|
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे|
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे|

जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो|
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो|

Thursday, March 01, 2012

चोर-चोर

'काही लोकांचा स्वभाव इतका वेगळा असतो ना कि कौतुक करावस वाटत. पण कौतुक करण्याइतके आपण अजून मोठे झालो नाही हे लक्षात येत. खर तर अश्या लोकांकडे बघून कळत कि आपण किती खुजे आहोत.'
असाच एक प्रसंग आज तुम्हाला सांगतो..
एका महानगरात नौकरी गमावलेला एक तरुण सिटीबस मधून उतरतो, तेव्हा त्याच्या लक्षात येते की त्याचे पाकीट चोराने लांबवले. 
 तो तरुण बुचकळ्यात पडतो. कारण त्याची नौकरी गेलेली असते आणि खिशात फक्त १५० रुपये आणि त्याने त्याच्या आईला लिहून ठेवलेले एक पत्र असते. ज्यात त्याने लिहिलेले असते की ,
"माझी नौकरी मी गमावून बसलो आणि तुला आता काही दिवस पैसे पाठवू शकत नाही."
तीन दिवसापासून ते पत्र त्याच्या खिशात असते. पोस्ट करू की नाही ह्या मनस्थितीतच त्याचे १५० रुपये आणि ते पत्र चोरी होते. १५० रुपये काही फार मोठी रक्कम नाही, पण त्या तरुणासाठी ते १५०० रुपयापेक्षा कमी नव्हते.

काही दिवसांनी त्याच्या आईचे पत्र त्याला मिळाले. तो तरुण आपल्या आईचे पत्र वाचून आश्चर्यचकित होतो. त्याची आई ने पत्रात लिहिले असते - "बाळ, तु पाठवलेले ५०० रुपयांचे मनीऑर्डर मला मिळाले. काळजी घे स्वतःची."

तो तरुण जाम बुचकळ्यात पडतो. त्याला प्रश्न पडतो, कोणी ५०० ची मनीऑर्डर केली असेल.

काही दिवसांनी परत त्याला एक पत्र येते, तोडक्या मोडक्या अक्षरात लिहिलेले, वाचण्यास अवघड पण ३ ते ४ ओळीचे -
 
“प्रिय भाई, 150 रुपए तुम्हारे.. और 350 रुपए अपनी ओर से मिलाकर मैंने तुम्हारी माँ को.. मनीआर्डर.. भेज दिया है..। फिकर.. न करना। माँ तो सबकी.. एक- जैसी ही होती है न..! वह क्यों भूखी रहे...?
तुम्हारा— जेबकतरा भाई..!!!
 
by : एक एकटा एकटाच

Friday, February 24, 2012

दिनूचे बिल.

दिनूचे वडील डॉक्टर होते. दिनू कधीकधी त्यांच्याबरोबर दवाखान्यात जात असे. तेथे पुष्कळसे लोक येत. कोणीतपासून घेण्यासाठी येत. कोणी औषधे घेण्यासाठी येत. कोणी म्हणे, "डॉक्टर, माझं पोट दुखतंय. मला तपासा."तर कोणी म्हणे, "डॉक्टर, माझं बिल किती झालं ते सांगा." 
दिनू एका लहानश्या खुर्चीवर बसून ते सारं पाहत असे व ऐकत असे. दवाखान्यातल्या ...बऱ्याचशा गोष्टी त्याला आताकळू लागल्या होत्या, पण "बिल" म्हणजे काय, हे त्याला अजून कळले नव्हते.

 
दिनूने एकदा वडिलांना विचारले, "बाबा, बिल म्हणजे काय हो?"

डॉक्टरांनी टेबलावरचा एक कागद घेतला आणि दिनूला दाखवला. "हे बघ. याला म्हणतात बिल. वाच!"


दिनू तो कागद वाचू लागला. त्यावर लिहिलं होतं -

_________________________________
रोग्याला तपासण्याबद्दल ... १० रुपये
दोनदा घरी येण्याबद्दल ... २० रुपये
आठ वेळा औषधांबद्दल ... ८ रुपये
________________________________
एकूण ... ३८ रुपये
________________________________

दिनू ते बिल कितीतरी वेळ वाचत होता. तो एकदम मध्येच हसला. त्याला काय वाटले कोणास ठाऊक? काहीतरीविचार त्याच्या डोक्यात आला. घरी गेल्यावर दिनू आपल्या खोलीत गेला आणि एका कागदावर त्याने आपल्याआईच्या नावावर एक बिल तयार केले. त्याच्यावर लिहिलं होतं -
___________________________________________
आज बागेतून फुले आणल्याबद्दल ... ५० पैसे
बाळाला दोन तास सांभाळल्याबद्दल ... २ रुपये
शेजारच्या काकूंकडे निरोप दिल्याबद्दल ... १ रुपया
दुकानातून साखर आणल्याबद्दल ... ५० पैसे
___________________________________________
एकूण ... ४ रुपये
___________________________________________

ते बिल त्याने आपल्या आईच्या खोलीत नेऊन ठेवले. दुसऱ्या दिवशी दिनू सकाळी लवकर उठला. त्याच्या उशाशी ४ रुपये ठेवलेले होते. दिनूने ते उचलले. तेवढ्यात तेथे ठेवलेला एक कागद त्याला दिसला. त्यावर काहीतरीलिहिलेले होते. त्याने कागद उचलला व चटकन वाचला. आईने दिनूच्या नावावर एक बिल तयार केले होते.

________________________________________________________________
लहानपणापासून आतापर्यंत वाढवल्याबद्दल ... काही नाही
चारदा आजारपणात दिवसरात्र जागून काळजी घेतल्याबद्दल ... काही नाही
गोष्ट सांगून करमणूक केल्याबद्दल ... काही नाही
वाचायला शिकवल्याबद्दल ... काही नाही
________________________________________________________________
एकूण ... काही नाही.
________________________________________________________________
दिनूच्या डोळ्यात एकदम पाणी आले. त्याचा गळा भरून आला. त्याच्या हातातला कागद गळून पडला. ते पैसेघेऊन तो तसाच आईकडे धावत गेला. काही न बोलता त्याने आईला पैसे परत केले, व तो आईच्या मांडीवर डोकेठेवून रडू लागला.

आईने दिनूला कुरवाळले. आणि त्याचा मुका घेत ती म्हणाली,

"तुझ्या बिलाचे पैसे पावले बरं, दिनू!"

 
- आचार्य अत्रे

Thursday, February 09, 2012

राग

एकदा एक माणुस ऑफिसमध्ये Boss खुप रागावले म्हणुन तडकाफडकी Half day सुटुन बसने घरी जायला निघतो.

बसमध्ये जेमतेम 10-12 जण असतील , तो रिकामी Seat पाहुन Tension मध्येच बसतो
पुढच्या Stop वर एक माणुस आपल्या दोन चिमुरड्यांसह त्या व्यक्तीच्या पुढच्या Seat वर येवुन बसतो.
 
ती लहान चिमुरडी मग बसमध्ये खुप धिंगाणा घालु लागतात, खिडकीच्या बाहेर डोकावुन मोठमोठ्याने ओरडतात, मध्येच भुक लागली म्हणुन रडकुंडलीला येतात .

त्या मागच्या Seat वर बसलेल्या व्यक्तीला याचा खुप राग येऊ लागतो, खुप वेळेस समाजावुनही ती मुले शांत होत नाहीत ते पाहुन तो त्यांच्या वडिलावर ओरडतो "सांभाळता येत नसेल मुलानां तर कशाला ऊगीच जन्माला घालताओ अशी मुलं ????"

त्यावर तो माणुस शांत पाणीदार डोळ्याने म्हणतो, " तुमच्या भावना मी समजु शकतो साहेब , पण या चिमुरड्या जीवाला कसं समजावु कि तुमची 'आई' या जगामध्ये नाही आता .., थोडयाच वेळापुर्वी तिच्यावर हॉस्पीटलमध्ये अंत्यसंस्कार करुन घरी निघालोय आम्ही. .
यावर त्या दुसर्या माणसाची मान शरमेने त्यापुढे झुकली...

MORAL :- कधीही समोरच्या माणसाच्या भावना लक्षात घेवुनच वर्तन करत जा.
 
by: एक एकटा एकटाच 

Saturday, February 04, 2012

आपण काय शिकलो?

 
मी घरी पोहचलो. साडे चार वाजले होते. हातपाय धूवून मी एका हाँटेलमध्ये गेलो. वडापाव संपवून मी चहा घेतला. तेवढ्यात तिथे एक ५०-५५ वर्षाची बाई आली. डोक्यावर भल मोठ जळणाचं ओझ तिनं बाजूला टाकल. कुठेतरी एखादा काळा केस, कपाळावरती मोठी कूंकुवाची छटा. घामामुळे कूंकुवाचा लाल रंग भुवईपर्यत आलेला, धारदार नाक, तंबाखूची मसेरीनं काळवंडलेले दात, सूरकुतलेले हात, तिन-चार जोड देऊन हातानेच शिवलेल नववारी लुगड आणि चोळी असा काही तिचा वेश होता.......
नुस्तच कालावाण मिळल का गं बाई? माझ्याकडं भाकर हाय. तिचा होकार मिळताच काळपट फडक्यातून त्या बाईन शिळी भाकर काढली. आणि दिलेल्या कालावणावर अधाशिपणान खाऊ लागली. मी विचार करीयला लागलो. आपण पैसे द्यावे का? हिला कुणीच नसेल का? आणि असेल तर अशी वेळ का यावी तिच्यावर? इतक्यात तिची भाकरी संपण्याच्या आत ती हाँटेलवाली मुलगी म्हणाली.
आजी, मिसळपाव घ्या. पैसे नाही घेणार! पोरी, आज खाईन पोटभरून पण उदया?
तुम्हाला मुलबाळ नाही का?

त्यावर त्या म्हणाल्या, तसं नाय काय, पोरगा मोठा, सायब हाय, परदेशाला इंजनेर हाय पण त्याला येळच न्हाय! कानाखाली कोणतरी जोराची चरकार मारावी आणि त्याचा आवाज मेंदूपर्यत घुमावा तसे हे शब्द माझ्या कानावर पडले. आणि विचारांच काहूर माजल. 
माणूस इतका बदलतो का? आपल संपूर्ण आयुष्य वाहून घेणा-या या माऊलीची त्याला क्षणभरही आठवण येत नसेल का? आणि सगळच अनुत्तरीत होत. माझी चेहरा खाली घालून मी आता विचार करीत होतो. इतक्यात माझ्या पाठीवर तोच थरथरता हात फिरला. मी वरती पाहील तर तिच बाई मला म्हणाली. इतका विचार करु नकोस बाळा, तुझ्या आई-बापाला निट जप म्हणजे झाल...........

मगतर मेल्याहून मेल्यासारख झाल. मी आता फक्त रडायचाच बाकी होतो. कारण एका क्षणात माझ पूर्ण अंतरंग त्या माऊलीन वाचलं. पण आम्हाला आमच्याच आई-वडीलांच थोडस दु:खसुद्धा कधीच जाणता येत नाही. जिवनाच्या सचोटीत एवढं शिक्षण घेऊनही आम्ही अगदीच अडाणी वाटतो यांच्यासमोर! कुठ शिक्षण घेतल असेल यांनी हे.
सेटलमेंट, न्यूजाँब, इनक्रिमेंट, प्रमोशनच्या घोळात आम्ही ही आमची माणसं कुठ हरवुन बसतो आम्हालाच कळत नाही. डोक जड झाल. मी उठलो आणि चालू लागलो. शेजारच्या जिल्हापरिषेद्येच्या शाळेत मास्तर मूलांना विचारत होते. आपण काय शिकलो? मी मनाशीच उत्तर दिलं, आयुष्यात इंजिनिअर नाही होता आल तरी चालेल पण चांगला, जबाबदार माणूस जरुर व्हायच .................
 

Friday, January 20, 2012

आई

एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२ वर्षाचा मुलगा राहत होते,  उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार त्याच्या हातात १० रुपये तरी असावे, पण घरात १० रुपये नाही म्हणून त्या माऊली बाजूच्या शेतात राबायला गेली संध्याकाळी मजुरीचे पैसे आणले, तितक्यात मुलगा शाळेतून आला आई ला म्हणाला मला जेवायला दे मी लवकर झोपतो उद्या जत्रेला जायचे आहे सकाळी लवकर उठेन.


मुलगा सकाळी लवकर उठला त्या माऊलीला पण उठवले, मुलगा अंघोळीला जाताना आईला म्हणाला आई लवकर न्याहारी तयार ठेव मी लगेच अंघोळ करून घेतो

माऊलीने भाकर करून ठेवली, दुध चुलीवर होते, मुलगा अंघोळ करून आला आई जवळ बसला आणि आई ला म्हणाला "मला लवकर दुध आणि भाकरी दे मला उशीर होतोय." आई ने आजू बाजूला पहिले दुध उतरवायला काहीच सापडत नव्हते पुन्हा मुलाचा आवाज आला "आई लवकर कर" माउलीने विचार न करता तसाच दुधाचा टोप हाताने उतरवला गरम दुधाच्या टोपाचे चटके मस्तकाला वेदना देऊ लागल्या हाताची लाही लाही झाली, पुन्हा मुलाचा आवाज आला "आई लवकर कर न उशीर होतोय" त्या माउलीने पुन्हा टोप उचलून दुध प्यालात ओतले आणि मुलाला दिले, त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्या मुलाने मान खाली घालून न्याहरी केली. आई ने जवळचे १० रुपये त्या मुलाला दिले.


मुलगा जत्रेत गेला संध्याकाळी परतला आई ने विचारले "बाळा जत्रेत काय-काय पहिले" मुलाने जत्रेतल्या गमती-जमती सांगितल्या मग आईने विचारले "दिलेल्या १० रुपयाचे की केलेस काही खाल्लेस कि नाही."

 
त्या मुलाने आई ला सांगितले की "तू डोळे बंद कर मी काहीतरी आणले आहे तुज्यासाठी" माऊलीने डोळे बंद केले मुलाने खिश्यातून सांडशी (गरम भांडे उचलायची पक्कड ) काढून आईच्या हातात दिली, आईच्या डोळ्यात त्या सांड्शीच्या स्पर्शाने अश्रू आले

 
आई धन्य झाली.....आईच्या हाताला झालेली इजा त्या मुलाच्या मनावर इजा करून गेली
 
सौजन्य : Yogesh Patil (Facebook)

Read This Heart Touching Stories