Jayesh Gujrati's Blog (in Marathi): February 2012

Search

Monday, February 27, 2012

तासाला किती कमवतो ?

एक नोकरदार माणूस रोजसारखा घरी आला... रोजसारखाचं उशीरा... त्याचा मुलगा सहा-सात वर्षाचा;  त्याची वाटचं पहात होता अगदी रोज पहातो तशीचं... 
तो घरात आला त्याचा मुलगा त्याच्या कडे पाहात होता... तो म्हणाला "काय रे काय झाले ? असा का पहातो आहे"
मुलगा म्हणाला "बाबा , एक प्रश्न विचारु का ?"
काहीसा त्रासिकपणे "हो विचार"
मुलगा "बाबा तुम्हाला एक तास काम केल्यावर किती पैसे मिळतात"
माणूस रागात "तुला काय त्याचे देणे घेणे ?? असे काही पण काय विचारतो ?"
मुलगा "सहज विचारले . सांगा ना... एका तासाला किती पैसे मिळतात ?"
माणूस वैतागून "तुला ऐकायचेच आहे ना... तासाला १०० रुपये"
मुलगा "असं का" काही क्षण गेले "बाबा माला ५० रु. द्या ना"
आता तो माणूस अगदि चिडलाचं... मुलावर ओरडला "असं का हे कारण होतं म्हणून तुला पैसे पाहीजे आहेत... म्हणून इतकी विचारपूस करतो का... खेळने घ्यायचे असेल काही त्या पैशांचे, नाही तर उधळपट्टी करणार असशील मी मर मर मरतो काम करतो आणि तु असा पैसा उधळतो, स्वार्थी  कुठला बापाची काळजी नाही कसली वरुन
मला विचारतो म्हणे तासाला किती कमवतो मी.... असे म्हणून त्याच्या एक कानात वाजवतो...
 
मुलगा हिरमुसला त्याच्या डोळ्यात पाणी दाटून आले तो आतल्या खोलीत गेला... माणूस ही जरा रागातचं होता बसला थोडा... मुलाचे शब्द डोक्यातचं घोळत होते असे कसे तो विचारतो मला तासाला किती कमवतो... पहाता-पहाता तास दोन तास निघून गेले... माणसाचा राग बराचं शांत झाला पण अजूनही मनात तेचं शब्द ...
"तासाला किती कमवतो"
 
असे का विचारले असे कधी विचारत नाही तो त्याला नक्की काय म्हणायचे होते ... त्याला काही पाहीजे आहे का... त्याला पैसे लागणार असतील... उगाचं चिडलो इतका असे म्हणून तो खोलीकडे वळला... दार उघडले
"बाळा झोपला का रे" माणूस म्हणाला
"नाही बाबा मी जागाचं आहे" मुलगा उत्तरला
"अरे बाळा रागवला का रे, मी तुला मारले ना ...
अरे तेव्हा मी कसा इतका चिडलो समजलेचं नाही , घे हे ५० रु."
मुलगा उठून बसला गोड हसला आनंदाने म्हणाला
"बाबा खरचं देता आहेत"
असे म्हणून ते ५० रु. घेतले मग त्याने उशी खालून अजून ५० रु. काढले माणसाने पाहीले की मुलाकडे तर आधीचं पैसे आहेत नेमके तीतेकेचं
मुलगा पैसे मोजत होता मग त्याने वडीलांकडे पाहीले हा परत थोडा चिडला
"अरे तुझ्या कडे आहेत ना पैसे "
"पण पुरेसे नव्हते" मुलगा उत्तरला "पण आता झाले"
पुढे म्हणाला "बाबा, तुम्ही दिलेले ५० रु आणि मी जमवलेले पैसे हे तुम्ही घ्या पूर्ण १०० रु आहेत... माणूस गोंधळला काय चालले आहे त्याला कळतचं नव्हते मुलगा असा काय वागतो आहे... मुलगा पुढे म्हणाला
"बाबा माला तुमचा एक तास हवा आहे, उद्या घरी एक तास लवकर या मला तुमच्या सोबत जेवायचे आहे उद्या माझा वाढदिवस आहे..."
माणसाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहात होते... त्याने मुलाला मिठीत घेतले... मुलगाही अगदी सुखावला  बाबांनी त्याला फार दिवसांनी असे मिठीत घेतले होते... 
ही गोष्ट त्यांच्यासाठी एक short reminder आहे जे नेहमी काम-काम आणि कामचं करतात करियर, पैसा कमवायच्या धडपडीत बरेच काही आहे ज्यापासून दुरावत आहेत .जमलंचं तर थोडा वेळ त्यांच्यासाठीही काढा जे आपल्या सहवासासाठी असुलेले आहेत आपला परिवार आपले नातलग मित्र मैत्रीणी सारे आपल्यावर प्रेम करतात आणि त्यांना फक्त थोडा वेळ  पाहीजे आपल्याकडून बाकी काही नाही... जमलंचं तर थोडा विचार करा...

Saturday, February 25, 2012

आपण कोण-कोण झाला आहात ?

 एका झाडा खाली पोपट वाघ आणि डुक्कर राहत आसतात, त्यांची खूप मैत्री होती, ते एक मेका शिवाय राहू शकत नव्हते, एके दिवशी वादळ आल, आणि त्या वादळामध्ये झाड कोसळून खाली पडले, आणि या प्रसंगा मध्ये पोपट मरण पावले. आपला मित्र मरण पावल्यामुळे वाघ आजारी पडला आणि त्या आजारात त्याचा मृत्यू झाला. आपले दोन्ही मित्र मरण पावल्यामुळे डुक्कर सुद्धा त्या परीस्तीतीत जिवंत राहू शकत नव्हता, आणि त्याने सुद्धा त्या ठिकाणी आपले प्राण सोडले.
     ..खूप दिवसांनी ज्या ठिकाणी पोपट वाघ आणि डुक्कर मरण पावले होते  त्या ठिकाणी एक ''मव्हाचे'' झाड रुजू लागले. पुढे मव्हाच्या झाडापासून मानवाने ''दारू'' बनवली. .. आणि म्हणूनच. ज्या वेळी माणूस दारू पितो त्यावेळी पहिले तो पोपट  होतो ..आणि पोपटा सारख बोलू लागतो. 
थोड्या वेळाने तो वाघ होतो..आणि कुणालाच मग तो ऐकत नाही, मीच मोठा-मोठा असे तो करतो. सगळ्यात शेवटी तो डुक्कर होतो.. आणि मग ज्या प्रमाणे डुक्कर चिखलात लोळतो त्याच प्रमाणे तो रस्तावर, गटारात लोळतो....
... आपण आता पर्यंत कोण कोण झाला आहात ?

Friday, February 24, 2012

दिनूचे बिल.

दिनूचे वडील डॉक्टर होते. दिनू कधीकधी त्यांच्याबरोबर दवाखान्यात जात असे. तेथे पुष्कळसे लोक येत. कोणीतपासून घेण्यासाठी येत. कोणी औषधे घेण्यासाठी येत. कोणी म्हणे, "डॉक्टर, माझं पोट दुखतंय. मला तपासा."तर कोणी म्हणे, "डॉक्टर, माझं बिल किती झालं ते सांगा." 
दिनू एका लहानश्या खुर्चीवर बसून ते सारं पाहत असे व ऐकत असे. दवाखान्यातल्या ...बऱ्याचशा गोष्टी त्याला आताकळू लागल्या होत्या, पण "बिल" म्हणजे काय, हे त्याला अजून कळले नव्हते.

 
दिनूने एकदा वडिलांना विचारले, "बाबा, बिल म्हणजे काय हो?"

डॉक्टरांनी टेबलावरचा एक कागद घेतला आणि दिनूला दाखवला. "हे बघ. याला म्हणतात बिल. वाच!"


दिनू तो कागद वाचू लागला. त्यावर लिहिलं होतं -

_________________________________
रोग्याला तपासण्याबद्दल ... १० रुपये
दोनदा घरी येण्याबद्दल ... २० रुपये
आठ वेळा औषधांबद्दल ... ८ रुपये
________________________________
एकूण ... ३८ रुपये
________________________________

दिनू ते बिल कितीतरी वेळ वाचत होता. तो एकदम मध्येच हसला. त्याला काय वाटले कोणास ठाऊक? काहीतरीविचार त्याच्या डोक्यात आला. घरी गेल्यावर दिनू आपल्या खोलीत गेला आणि एका कागदावर त्याने आपल्याआईच्या नावावर एक बिल तयार केले. त्याच्यावर लिहिलं होतं -
___________________________________________
आज बागेतून फुले आणल्याबद्दल ... ५० पैसे
बाळाला दोन तास सांभाळल्याबद्दल ... २ रुपये
शेजारच्या काकूंकडे निरोप दिल्याबद्दल ... १ रुपया
दुकानातून साखर आणल्याबद्दल ... ५० पैसे
___________________________________________
एकूण ... ४ रुपये
___________________________________________

ते बिल त्याने आपल्या आईच्या खोलीत नेऊन ठेवले. दुसऱ्या दिवशी दिनू सकाळी लवकर उठला. त्याच्या उशाशी ४ रुपये ठेवलेले होते. दिनूने ते उचलले. तेवढ्यात तेथे ठेवलेला एक कागद त्याला दिसला. त्यावर काहीतरीलिहिलेले होते. त्याने कागद उचलला व चटकन वाचला. आईने दिनूच्या नावावर एक बिल तयार केले होते.

________________________________________________________________
लहानपणापासून आतापर्यंत वाढवल्याबद्दल ... काही नाही
चारदा आजारपणात दिवसरात्र जागून काळजी घेतल्याबद्दल ... काही नाही
गोष्ट सांगून करमणूक केल्याबद्दल ... काही नाही
वाचायला शिकवल्याबद्दल ... काही नाही
________________________________________________________________
एकूण ... काही नाही.
________________________________________________________________
दिनूच्या डोळ्यात एकदम पाणी आले. त्याचा गळा भरून आला. त्याच्या हातातला कागद गळून पडला. ते पैसेघेऊन तो तसाच आईकडे धावत गेला. काही न बोलता त्याने आईला पैसे परत केले, व तो आईच्या मांडीवर डोकेठेवून रडू लागला.

आईने दिनूला कुरवाळले. आणि त्याचा मुका घेत ती म्हणाली,

"तुझ्या बिलाचे पैसे पावले बरं, दिनू!"

 
- आचार्य अत्रे

Thursday, February 23, 2012

पोपट...

मी, ती आणि आपली नेहमीचीच बस..... छोटीशी प्रेम कथा
सकाळी ७.५० च्या बसमध्ये मी नेहमी प्रमाणे चढलो..
तिकीट काढल सगळ झाल आणि वरच्या दांडीला लटकलो
इकड तिकड बघताना सहज तिच्यावर नजर गेली..
शब्द नाहीत, smile नाही direct काळजाला जाऊन
भिडली...

तिच्याकडे बघून मग मी एकटा मनाशी हसायचो..
तिला दिसू नये म्हणून ते smile ओठातच ठेवायचो...
अस रोज घडता घडता माझ smile तिला दिसलं
ओळख नाही पाळख नाही तिन पण आपल्याला smile दिलं..
क्षणात मनाच्या मोराचा झकास पिसारा फुलला....
तीच ते हसू बघून दिल garden garden झाला...
दुसऱ्या दिवशी धाडस करून मी तिच्याशी बोललो
बोलता बोलता मी चक्क तिच्या प्रेमातच पडलो ..
हळू हळू ती रोज माझ्यासाठी जागा धरायला लागली..
मग ती कस तिकीट काढणार?
म्हणून तिकीटाची जबाबदारी माझ्यावर आली..
अस होत होत चहा झाला कॉफी झाली..
दोन पिक्चर झाले तिच्या birthday ची party झाली..
म्हंटल तिला आता आपल्या मनीच गुज सांगाव
तिचा होकार येताच तिला आपल्या मिठीत घ्याव ..
म्हणून दुसऱ्या दिवशी ग्रीटिंग card नी गुलाबाचं फूल
आणलं..
नवीन शर्ट घालून तिच्या शेजारी स्थान ग्रहण केल..
तिला ग्रीटिंग देणार तेवढ्यात तिन हातात
पत्रिका ठेवली
म्हणाली "२३ ला लग्न आहे कालच engagement
झाली "
म्हणल च्यायला नेहमी आपलाच का असा पोपट होतो?
कुणावर प्रेम केल कि त्याचा नेहमी असा का शेवट होतो?
सगळ मनात ठेवून मग तीच अभिनंदन केल
आता उद्यापासून नाही म्हणून तीच शेवटच ticket काढलं..
२३ ला आठवणीने तिच्या लग्नाला गेलो
तिला आणि तिचा नवऱ्याला दोघांना congrats करून
आलो.
…………………
आता मी रोज तसाच बसने जातो एकट्याच ticket काढतो
जागा मिळाली तर बसतो नाहीतर दांडीला लटकतो
पण कुणीही बघून हसलं तरी मुळीच हसत नाही
आणि जागा मिळाली तरीही मुलींजवळ बसत नाही...

Wednesday, February 22, 2012

७ वी ला असताना ...

एका मुलाची कथा
 

७ वी ला असताना ...

मी माझ्या बाजूच्या बाकावर बसणाऱ्या मुली कडे पाहत राहायचो ..
ती माझी "बेस्ट फ्रेंड" होती ...
मला ती खरच खूप आवडायची,
पण तिने मला कधी त्या नजरेतून पाहिलं नव्हत
आणि ते मला माहित होत....




वर्ग सुटल्या नंतर तिने माझ्याकडे तिच्या मिस झालेल्या तासांच्या notes मागितल्या
मी तिला दिल्या
ती गेली तिला मला सांगायचा होत बरच काही पण जमलच नाही
 "माहित नाही का.....??"

कॉलेजला असताना ...
माझ्या फोन वर call आला...
तिचाचं होता तो ...
ती रडत होती आणि त्यातच पुट पूटत होती,
आणि ती मला सांगत होती तिचं ज्याच्या वर प्रेम होतं त्याने कसा त्रास दिला तिला...
तिने मला भेटायला बोलवलं होत,
मी तिला भेटायला गेलो...
मी तिच्या समोरचं बसलो होतो
मी तिच्या डोळ्यात आणि अश्रू पाहत बसलो होतो...
२ तास काही बोललो नाही .. मला तिला सांगायचा होतं...
मी तिच्यासाठी आणि माझ्यासाठी चित्रपटाची तिकीट काढली...
पण तिने मला म्हटलं मी झोपते..
तिने म्हटलं "बर वाटल तू माझ्या साठी इथे आलास..."
खूप वेळा शांत उभे होतो...
मग मी निघालो...
आज हि मला म्हणता नाही आला कि माझा तिच्या वर किती प्रेम आहे ...
माहित नाही का...?
.

सिनियर वर्षाला

आमच्या कॉलेज मध्ये prom night होती..ज्यात मुलगा आणि मुलीने एका जोडीत जायचं
ती माझ्या locker जवळ आली आणि म्हणाली...
माझ्या सोबत कोणी नाहीये ... तु माझ्या सोबत येशील...
माझ्या सोबत हि कोणी नव्हत...
आम्ही दोघांनी "बेस्ट फ्रेंड्स " ह्या नात्याने जाण्याचा निर्णय घेतला ...
 

PROM Night ला ...

Prom NIGHT ला सगळ काही निट झालं..
आम्ही दोघे निघालो... मी तिची वाट पाहत होतो...
ती तेवढ्यात आली... तिने माझ्या कडे बघून एक smile दिली
आज हि नेहमी सारखा तिला काही बोलू शकलो नाही..
पण मी खुश होतो... कि ती खुश आहे...

GRADUATION DAY ला ...

दिवसा मागून दिवस गेले...
आठवडे लोटले किती तरी महिने गेले
तिला काही बोलण्या आधीच was graduation day आला ...
मी तिला पाहिलं ...
तीने साडी नेसली होती... खूप छान दिसत होती..
माझ तिच्यावर एकतर्फी प्रेम होत पण काय करणार तिच जमत नव्हत ना
आमची शेवटीची भेट होणार होती...
ती समोरून आली... मला तर काही बोलताच आलं नाही...
तिने माझ्या चेहर्यावरून हात फिरवला ...

आणि म्हटली "आपण नक्की भेटू कधी तरी काळजी घे.."
बघाना गंमत आज हि जमल नाही बोलायला
काही वर्षांनी ...

मी लग्नात आलो होतो...
आणि ते लग्न होत तीचं .. तिचं दुसर्या सोबत लग्न ठरलं होत ..
माझं प्रेम कधी व्यक्तच नाही करता आलं...पण तिला मैत्रीचः नात जास्त पसंत होत आणि मी तेवढचं निभावल....
"तू आज हि माझ्या सोबत आहेस " असं ती म्हणाली डोळ्यातले अश्रू लपवत हो म्हटले ..
आज हि तिला म्हणता आले नाही कि माझं तुझ्या वर प्रेम आहे..

खूप वर्षांनी ...

मी आमच्या शाळेत एकदा गेलो .
तिथे आमच्या वर्गातले सर्वजन आले होते...
ती हि...
तिथे प्रत्येकाने आपली लहानपणी लिहिलेली पत्र ठेवली होती...
मी तिने लिहिलेलं एक पत्र सहज घेतलं... आणि वाचायला लागलो...

7th: "वर्गात असताना विनीत नेहमीचं माझ्या कडे बघत असतो... किती वेडा आहे हा मुलगा"

College Year: "आज हि मी त्याला खोटं सांगितलं कि माझं ब्रेकअप झालं तरी हा वेडा माझ्या साठी आला"
 
Prom Night: "आज तरी त्याने मला म्हणावं कि माझ्या वर प्रेम आहे .... मी वाट बघतेय...मला त्याला सांगावस वाटतंय कि माझं हि त्याच्यावर खूप प्रेम आहे त्यालाही कळू दे..."
 
Graduation Year: "किती लाजाळू आहे हा, साडीत पाहून काही बोलला नाही"
 

Marriage Day: "आज माझा लग्न आहे... माझा त्याच्यावर प्रेम आहे पण त्याने अजून नाही मला काही म्हटलं नाही तुझ्या आठवणी माझ्या नेहमी स्मरणात राहतील..."
 
 

ते वाचल्या नंतर तो तिथेच रडायला लागला...
आणि त्याने पाहिलं तर समोर तीही आज रडत होती...
कारण एकाचा दोघांचा असीम प्रेम पण जमल नाही व्यक्त करायला
 
  
Vishal.......♥

Tuesday, February 21, 2012

आयुष्याची चव आणि मीठ

एकदा एक अनुभवी आणि वृध्द गुरू आपल्या शिष्याच्या तक्रारींना कंटाळून गेले होते. एके दिवशी सकाळी त्यांनी त्या शिष्याला थोडे मीठ आणायला सांगितले. तो शिष्य मीठ घेऊन परतला तेव्हा गुरूंनी त्या दुखी तरूणाला त्यातील मूठभर मीठ एका एका पाणी भरलेल्या पेल्यात टाकून ते पिण्यास सांगीतले.
 "पाणी चवीला कसे लागले ?" गुरूंनी विचारले.
"कडु" असे म्हणून शिष्याने ते पाणी थुंकले.
गुरूंनी मंद हास्य केलं आणि पुन्हा त्या शिष्याला मुठभर मीठ त्या तळयात टाकण्यास सांगितले. ते दोघे तळयाजवळ आले. शिष्याने मूठभर मीठ त्या तळयात मिसळल्यानंतर ते वृध्द गुरू म्हणाले,
"आता या तळयातील पाणी पिऊन पहा."

त्याच्या हनुवटीवरून पाणी खाली ओघळल्यावर गुरूंनी त्याला विचारलं,
"आता यापाण्याची चव कशी आहे ?"
"ताजी आणि मधुर !" शिष्याने सांगितले.
"आता तुला मिठाची चव लागतेय ?"
"नाही."
गुरू त्या शिष्याच्या जवळ बसले आणि त्यांनी त्याचा हात हातात घेतला. ते म्हणाले, "आयुष्याची चवही अगदी मिठासारखीच असते. आयुष्यातील दुखही तेवढच असतं, परंतु आपण ते दुख कशात मिसळतो यावर त्याचा कडवटपणा अवलंबुन असतो. म्हणून जेव्हा आपण दुखात असतो तेव्हा आपण एकच गोष्ट करू शकतो. ती म्हणजे, आपण आपल्या भावना व विचार व्यापक ठेवल्या पाहिजेत. पेला होणं थांबवून तळं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

तात्पर्यः नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.
 
by: एक एकटा एकटाच

Thursday, February 16, 2012

खुप विसरण्याचा प्रयत्न करतोय

कधीच न्हवत वाटल मला
अस पण घडेल...
चार दिवसाच्या प्रेमासाठी
आयुष्यभर रडेन
नेहमी मला म्हणायची ती

डिअर आपण वेगळ नाही व्हायच
लग्न करून आपण खुप सुखात रहायच
कितीही झाला विरोध तरी
लग्न नाही मोडायच
आपल हे सुंदर प्रेम अर्ध्यावर
कधी च नाही सोडायच
अशा तिच्या गप्पा गोष्टी
मला नेहमीच छान वाटायच्या
आणि दूर स्वप्नात घेउन मला जायच्या
मी सुद्धा वेड्या सारखा खुश होउन जायचो
दिवस रात्र तिच्याशिच गप्पा मारत बसायचो
आठवून तीच बोलनं  खुप-खुप हसायचो
आणि येनार्य़ा  प्रत्येक स्थळाला नकार मी दयायचो
दोन दिवस तिचा एस-एम-एस नाही आला
म्हणून मीच तिला बाहेरून कॉल केला
घरातील फोन आणि मोबाइल सगळ
स्विच ऑफ होत
भारावलेल्या माझ्या मनाला काहीच सुचत न्हवत
तिच्या  क्वालिनित गेल्यावर समजल
तीच लग्न ठरलय
एंगेजमेंट साठी पाहुन्यान्नी सार घर भरलय
थरथरत्या पाउलांनि
मी तिच्या घरी गेलो
ती त्या मुलाला पेढे भरवतेय पाहून
भाराउनच गेलो
परक्या पाहून्या सारखी ती
माझ्या कड़े पहात होती
आणि माझ्या डोळ्यातील आसव
ओठा वर येत होती ......
खुप-खुप रडलो पण तिला माया येत न्हवती
कारण ती तर फ़क्त गरजे पुरतीच जवळ होती.........
 
by :तुझ्याविना एक एकटा एकटाच मी

Tuesday, February 14, 2012

१०:१५ ची CST लोकल

१० :१५ ची CST लोकल ट्रेन सुटली .. धावता धावताच तो चढला .. धावत पळत.. कसा बसा गर्दीतून तो आत शिरला.. आत मध्ये येताच क्षणी त्याची नजर पुढच्या दरवाज्या जवळ… तो पूर्णपणे कावरा बावरा.. बहुतेक त्याची नजर तिलाच शोधात असावी.. बराच वेळ.. त्याने पाहिलं .. पुढच्या दोन्ही दरवाज्यांजवळ येऊन पाहिलं.. त्याच्या नजरेत.. एक भीती.. एक हुरहूर.. तिच्याबद्दलची काळजी.. दिसत होती.. त्याने गर्दीतून शेवटी वाट काढत पुढच्या दरवाज्याजवळ येऊन परत खात्री केली.. रुमाल काढून घाम पुसला.. लगेच काहीतरी आठवल्यासारख त्याने ..आपला मोबाईल फोन बाहेर काढला.. मोबाईल मध्ये नंबर शोधून.. लगेच फोन केला..  नुसताच हेलो हेलो ऐकू आलं.. तिकडून काहीच आवाज येत नसावा.. त्याने पुन्हा प्रयत्न केला.. पण मात्र नाईलाज.. शेवटी त्याने.. शांत राहण्याचा निर्णय घेतला..! पण.. शांत राहून सुद्धा.. तो इकडे तिकडे पाहत होता.. कि ती कुठे बसली तर नाहीये ना..!
 खर तर.. त्याची ही रोजची सवय झाली होती.. रोज स्टेशन वर त्याने तिची वाट पाहणे.. तिचे ट्रेन मध्ये चढणे.. त्याचे तिला पाहणे.. रोजचा एकत्र ट्रेन मधला प्रवास..! गर्दीतून… त्याने तिला दिलेलं स्मितहास्य.. अन त्यावर.. तिने ही दिलेला प्रतिसाद.. असं दोघांच.. प्रेम वाढत गेलं.. प्रेमाच्या बंधनात दोघे अडकले.. जसा रोजचा प्रवास तसा आयुष्याचा प्रवास सुद्धा एकत्र करण्याचं त्यांनी ठरवलं.. पण नियतीला ते मान्य नव्हतं.. घडू नये तसचं घडलं..

एके दिवशी अचानक…. ट्रेन मध्ये आरडा ओरडा…. बायकांच्या किंकाळ्या.. माणसांची गडबड.. ट्रेन थांबवण्यासाठीची लोकांची धडपड.. सारे वातावरण भयानक.. “कोणी चैन खेचा चैन खेचा.. मुलगी पडली ” अश्या हाका. ट्रेन मधले लोकं उठून बाहेर पाहायला लागले.. ट्रेन थांबली.. पण… ट्रेन थांबण्या आधीच.. सार संपलं होतं… तीच मुलगी ट्रेन मध्ये चढताना.. पाय घसरून पडली होती.. तिचे शरीर ट्रेन आणि प्लाटफोर्म मधल्या अंतरात अडकलं होतं.. काही समजण्याच्या आधीच.. तीच आयुष्य संपलं होतं.. त्याच्या नजरे समोर ती त्याला कायमची सोडून गेली होती.. सार निःश्ब्ध.. हृदयाचे ठोके चुकले… या परिस्थितीत काय करावं.. त्याला काहीच कळत नव्हतं.. जमलेल्या लोकांनी आणि पोलिसांनी.. राहिलेल्या गोष्टींची जबाबदारी घेतली.. पण त्याचं मन आतून पूर्णपणे ढासाळून गेलं होतं… नुसतं स्तब्ध होऊन तो तिच्या कडे पाहत राहिला….  मगाशीच आल्या आल्या तिने मारलेल्या गप्पा.. त्यांनी एकत्र घालवलेले सारे क्षण आठवायला लागले… आपलं माणूस आपल्याला कायमचं सोडून गेल्यावर त्याची झालेली दयनीय अवस्था पाहून.. डोळ्यात आसवांनी आपोआप वाट धरली होती… आयुष्य हे किती क्षणभंगुर असतं.. ह्याचा अनुभव फार जवळून त्याला जाणवला.. त्याच जागी तो.. एकटाच रडत बसला..

आज पण तो रोज तिची वाट पाहतो.. तिकडेच.. त्याचं जागी.. १०:१५ ची CST पकडतो.. लोकल मध्ये चढल्यावर… असाच काहीसा तिला तो रोज शोधत राहतो.. अन… नंतर परत.. सार आठवून . भरगच्च डोळ्यांनी निस्तब्ध अश्रू गाळत शांत बसतो..

आयुष्य हे क्षणभंगुर आहे.. आपल्या वर प्रेम करणारे आपली काळजी करणारे बरेच लोकं असतात.. आपण नसण्याने त्यांच्या आयुष्यात काय घडू शकत याचा विचार करा.. घाई.. ऑफीस… सगळ्यांच्याच नशिबी असतं.. पण जीवन हे अमूल्य असतं.. ह्याचा विचार करा.. अन आजपासून.. जपून प्रवास करा..
by: एक एकटा एकटाच

Thursday, February 09, 2012

राग

एकदा एक माणुस ऑफिसमध्ये Boss खुप रागावले म्हणुन तडकाफडकी Half day सुटुन बसने घरी जायला निघतो.

बसमध्ये जेमतेम 10-12 जण असतील , तो रिकामी Seat पाहुन Tension मध्येच बसतो
पुढच्या Stop वर एक माणुस आपल्या दोन चिमुरड्यांसह त्या व्यक्तीच्या पुढच्या Seat वर येवुन बसतो.
 
ती लहान चिमुरडी मग बसमध्ये खुप धिंगाणा घालु लागतात, खिडकीच्या बाहेर डोकावुन मोठमोठ्याने ओरडतात, मध्येच भुक लागली म्हणुन रडकुंडलीला येतात .

त्या मागच्या Seat वर बसलेल्या व्यक्तीला याचा खुप राग येऊ लागतो, खुप वेळेस समाजावुनही ती मुले शांत होत नाहीत ते पाहुन तो त्यांच्या वडिलावर ओरडतो "सांभाळता येत नसेल मुलानां तर कशाला ऊगीच जन्माला घालताओ अशी मुलं ????"

त्यावर तो माणुस शांत पाणीदार डोळ्याने म्हणतो, " तुमच्या भावना मी समजु शकतो साहेब , पण या चिमुरड्या जीवाला कसं समजावु कि तुमची 'आई' या जगामध्ये नाही आता .., थोडयाच वेळापुर्वी तिच्यावर हॉस्पीटलमध्ये अंत्यसंस्कार करुन घरी निघालोय आम्ही. .
यावर त्या दुसर्या माणसाची मान शरमेने त्यापुढे झुकली...

MORAL :- कधीही समोरच्या माणसाच्या भावना लक्षात घेवुनच वर्तन करत जा.
 
by: एक एकटा एकटाच 

कुणाचा मृत्यू अत्यंत भयानक तऱ्हेने झाला?

दोन जण स्वर्गात जाण्याच्या रांगेत उभे होते. यमाने त्यांना थांबवित म्हटले, ''स्वर्ग जवळपास फुल झालेला आहे त्यामुळे तुम्हापैकी ज्या कुणाचा मृत्यू अत्यंत भयानक तऱ्हेने झाला आहे अशालाच मी आत सोडणार आहे ... तर तुम्ही तुमची कहानी सांगा... आणि त्यावरुन मी ठरविन तुम्हाला आत सोडायचे आहे की नाही ''

पहिला माणूस आपली कहानी सांगू लागला,
''एवढ्यात मला माझ्या बायकोवर संशय होताच... की तीचं कुठंतरी दुसरीकडे लफडं चालू असावं... म्हणून आज मी लवकर घरी आलो होतो की जेणेकरुन तिला रेड हॅन्डेड पकडावं... जेव्हा मी माझ्या 25 व्या मजल्यावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये गेलो... घरात काहीतरी मला खटकलं... पण घरात सर्वत्र शोध घेतला तरी कुणी सापडलं नाही... शेवटी मी बाल्कनीत गेलो आणि तिथे मला तो माणूस सापडला होता तो बाल्कनीत रेलींगला लोंबकळत होता... 25 मजले जमिनीपासून वर!... त्याला पाहताच माझा दिमाग सटकला आणि मी त्याला मारायला लागलो... हाताने पायाने सर्व प्रकाराने मी त्याला मारायला लागलो पण तो साला खाली पडतच नव्हता... शेवटी मी घरात परत आलो, एक हातोडा आणला आणि त्याच्या बोटांवर मारायला लागलो... तो काही जास्त वेळ ते सहन करु शकला नाही आणि तो खाली पडला... पण 25 व्या मजल्यावरुन पडूनही खाली तो एका झुडपात पडला आणि वाचला... माझं डोकं अजुनच सटकलं... मी किचनमध्ये गेलो आणि फ्रिज उचलून वरुन त्या माणसाच्या अंगावर टाकला... तो फ्रिज बरोबर त्याच्या अंगावर पडून तो जागच्या जागीच मेला.. पण तोपर्यंत माझा राग आणि ताण एवढा जास्त झाला होता की मीही हार्टअटॅक येवून बाल्कनीवर तिथल्या तिथेच मेलो..''

'' अरेरे ... तुझ्यासाठी आजचा दिवस फारच वाईट ठरला ... नाही?'' यम त्या माणसाला म्हणाला आणि त्याने त्याला आत घेतले.

रांगेतला दुसरा माणूस पुढे येताच यमाने त्यालाही तेच स्वर्ग जवळपास भरल्याचे सांगितले आणि त्याला त्याची कहानी सांगायला सांगितली.

दुसरा माणूस त्याची कहानी सांगायला लागला -

''आजचा दिवस माझ्यासाठी फारच चमत्कारीक होता... काय झालं मी 26व्या फ्लोअरवर माझ्या अपार्टमेंटमधे राहतो आणि रोज सकाळी मी माझ्या बाल्कनीत व्यायाम करीत असतो... पण आज काय झालं... मी व्यायाम करतांना घसरलो असेन किंवा तसंच काहीतरी ... कारण मी माझ्या बाल्कनीच्या काठावरुन खाली पडलो ... पण माझं नशिब चांगलं माझ्या खालच्या फ्लोअरच्या बाल्कनीचं रेलींग माझ्या हाताला लागलं... मला माहित होतं की मी असा जास्तवेळ लटकत राहू शकणार नाही... तेवढ्यात अचानक हा माणूस बाल्कनीत आला... मला वाटलं की चला आता हा आपल्याला वाचवणार .. पण तो साला मला लाथा बुक्याने मारायला लागला.. मी आटोकाट प्रयत्न करुन रेलींगला धरुन लटकत होतो पण तेवढ्यात हा साला आत गेला आणि हातोडा घेवून येवून माझ्या बोटांवर हातोड्याने मारायला लागला... शेवटी माझे हात सुटले आणि मी म्हटलं जावूद्या आपण काही आज वाचत नाही ... पण पुन्हा मी लकी ठरलो आणि खाली एका झुडपात पडलो... घाबरलो होतो पण मला विषेश लागलं नव्हतं... जेव्हा मी विचार करीत होतो की आपण ठिक आहोत... तेवढ्यात एक रेफ्रिजरेटर वरुन खाली माझ्या अंगावर पडलं ... आणि मी इथे पोहोचलो''
by: एक एकटा एकटाच

एक छोटीशी प्रेम कथा

होता एक प्रेम वेडा तिच्यावर खूप करायचा..... म्हणतात ना शोधणारयाला देव हि मिळतो........... तसेच ह्याने तिला शोधले होते. तीन वर्षाच्या प्रयात्ना नंतर ह्याने तिला मिळवलं होत.. दोघेही एकमेंकावर जीवापाड प्रेम करायचे... तीच जरा जास्तच होत पण काय करणार दोघांची हि भेट होण शक्य नव्हती कारण ती गावी आणि हा कायमचा मुंबईला.. फोन वर बोलन तसे दररोजचेच पण भेट फक्त सहा महिन्याने होत असे.........
पण एक दिवस पूर्ण नूरच पालाडतो.... ह्याला अचानक रक्ताच्या उलट्या होतात.. ह्याला डॉक्टर कडून समजत कि मला कर्क रोग झालाय आणि माझ्या हातात फक्त सहा महिने उरले आहेत.हा तिला समजू देत नाही.... कारण सहा महिन्यांनी तिचा वाढदिवस असतो.... आणि तिच्या वाढदिवशी ह्याला तिला पहायचे असते...

तिच्या वाढदिवसाला चार दिवस बाकी असतात..आणि ह्याला कळून चुकलेले असते कि आपली वेळ जवळ आलीय ..हा मनात विचार करतो कि हिच्या वाढदिवशी आपण हिला शेवटच पहायचं आणि मगच आपण आपले प्राण सोडायचे...सतत चार दिवस हा तिला त्याच ठिकाणी भेटायला बोलवतो ज्या ठिकाणी ह्यांची पहिली भेट झाली होती...तिच्या
कॉलेज मध्ये फंक्शन असल्या मुळे आपण वाढदिवसाच्या दुसर्या दिवशी जाऊ असे त्याला सांगते...हा तिला शेवटच विचारतो कि तुला यायचं आहे कि नाही...कसलाही न विचार करता ती त्याला नाही सांगते...वाढदिवसाचा दिवस उजाडतो....ह्याची वेळ जवळ आलेली असते ह्याच्याकडे फक्त तीन मिनिटे असतात...हा तिला फोन करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो...हि त्याला विचारते काय करतोयस.........आणि हा शेवटी एवढच म्हणतो....

आज मी मृत्युच्या दारी उभा आहे ग........................ मरता मरता तुला
तुझ्या वाढदिवशी शेवटच पहायची मनापासून खूप इच्छा होती ग...पण तुही नाही म्हणालीस........... जाता जाता तुझ्या मिठी मध्ये यायचं होत पण तुला भेटायचे नव्हत................... तेव्हा तर
नाही पण मला मेल्यावर तरी मिठी मध्ये घेशील ना?????हि विचारते काय झाल आणि फोन कट होतो............ हि त्याच्या घरी येते पण वेळ निघून गेलेली असते......तिला त्याच्या आईकडून समजत.......हि जेव्हा त्याला आपल्या मिठी मध्ये घेऊन रडत असते तेव्हा त्याचा डावा हात खाली पडतो.. त्याच्या हातावर लिहिलेलं असत कि.................

ए जानु नको रडूस ग...
कारण तुझ्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी माझे हात मेले मला माफ कर..............................
ह्यांने
ज्या ठिकाणी तिला भेटण्यासाठी बोलवलं असत त्याच ठिकाणी हि प्रेम वेडी आपल्या वाढदिवशी फुल घेऊन त्याची वाट पाहत असते... फक्त ह्याच आशेने कि तो कुणाच्या तरी रुपात येईल आणि तिला मिठीत घेईल... पण म्हणतात ना

(डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो.पण माथ्या आड गेलेला जिवलग परत कधीच दिसत नाही.........)
by : एक एकटा एकटाच

वाढदिवस

एका लहान मुलाचा वाढदिवस असतो...
तो त्याच्या वडिलांना विचारतो,
"बाबा तुम्ही माझ्या वाढदिवसाला असे जुने कपडे का घातले आहेत???"
तेव्हा त्याचे वडील म्हणाले :
"कारण माझ्या कडे तितकेच पैसे आहेत बाळा कि मी एका साठीच कपडे घेवू शकतो ...
आणि आताच्या घडीला माझ्या साठी तुला कपडे घेण महत्वाचा आहे...."

२० वर्षांचा काळ लोटला
आता वडील मुलाला विचारत होते
"अरे तू सगळी रक्कम जमा का करत आहेस आणि जुनेच कपडे घालून फिरतोस..."

मुलगा म्हणाला:
"बाबा मला एका घर घ्यायचं त्या माणसाठी ज्याने मला खालून इतका वर आणलं
त्यांनी मला एक ओळख मिळवून दिली...."

बाप हि निशब्द झाला
मनात म्हटला "जीवन सार्थ झाल... आता डोळे मिटलो तरी चिंता नाही...."

मुलगा लगेच म्हणाला "बाबा मला तुमची अजून हि गरज आहे..."

त्यानंतर १ तास तरी दोघा बाप लेकाला अश्रू आवरले नाही...


Saturday, February 04, 2012

माझा-तुझा संबंध संपला.......

त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते..
त्याचं जरा जास्तच. तिच्यासाठी काय करु आणि काय नको असं त्याला झालेलं. पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला. कडकाच होता बिचारा. पण भलताच romantic .... तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही त्याला करवत नसे. तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं... असं त्याला मनापासुन वाटतं होतं. पण द्यायच काय...? खिशात तर दिडक्या नाहीत.. शेवटी न राहवुन त्याने तिला रंगीत कागदांची फ़ुलंच प्रेझेण्ट केली.. ती खुष होती.. तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता  त्यात ती समाधानीच होती.. तसाही तो सामन्यच होता. जेमतेम नोकरी.. भविष्यात काही करुन दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत नव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते दोन जीव सुखात होते...
 

पण एक दिवस सगळा नुरच पालटला..ती म्हणाली, "तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडखड्त, मन मारतचं जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तु मला..? काय आहे तुझ्याकडे...? - तर काहीच नाहि... मी परदेशी चालले आहे.. पुन्हा कधीच परत येणार नाही.. तु मला विसर. आजपासुन आपले मार्ग निराळे.. माझा-तुझा संबंध संपला......." ती कायमची निघुन गेली... हा मॊडुन पडला.... संपलाच जणु काही.... सर्व काही संपले त्याच्यासाठी.. दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुन संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या.. त्याने ठरवलं, 'तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलं ना..? मग आता पॆसाच कमवुन दाखवायचा. इतका की आपल्यापुढे सारं जग तिला थिटं दिसलं पाहिजे.. 'या जिद्दीने पेटुन उठ्ला तो.. झोकुन दिलं स्वतःला..! कष्ट केले.. राब राब राबला.. मित्रांनी मदत केली. चांगले लॊक भेट्ले.. त्याचे दिवस पालटले.. तो खुप श्रींमत झाला.. स्वतःची कंपनी उभारली.. पॆसा, नोकर, चाकर, गाड्या, मानमरातब सगळं कमावलं. विरहाच्या आगीतुन, प्रेमभंगाच्या अपमानास्पद दुःखातुन तो बाहेर पडला.. उभा राहिला.. जगण्यासाठी धडपडला आणि यशस्वीही झाला.. पण तरीही त्याच्या मनात चुटपुट  कायमच होती.. ती सोडुन गेल्याची.. तिनं नाकारल्याची.. आपल्या गरीबीचा अपमान केल्याची.. तिच्यावरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती.

एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतुन तो जात होता.. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता.. गाडिच्या काचेतुन बाहेर पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाच छत्रीत कुड्कुडत उभं होतं.. भिजलेल्या त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं.. त्याने गाडी थांबवली.. आणि नीट पाहीलं.. हे 'तिचेच' आई-वडील.!! त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली.. त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत होत.. त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती.. त्यांनी आपली श्रींमती पहावी.. त्यानी आपली गाडी पहावी.. आपली प्रगती पाहून त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा.. असं त्याला मनोमन वाटतं होत.. तिला धडा शिकवण्याच्या..

अपमानाच्या घावांची परतफ़ेड करण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हे त्त्याला जाणवतं. ते दोघे मात्र स्मशान भुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच राहातात.. हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे जातॊ. पाहतो आणि कोसळतोच...

तिचाच फ़ोटो.. तसाच हसरा चेहरा... आणि कबरीजवळ ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं... हा सुन्न झाला... धावतच गेला कबरीकडे... तिच्या आईबाबांना विचारलं... काय झालं ते सांगा....
ते म्हणाले... ती परदेशी कधीच गेली नाही. तिला 'कर्करोग' झाला होता.. तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे दिवस होते तिच्या हातात... आपल्या अकाली जाण्याचं दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन प्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली.. तू संतापुन उभा राहशील.. जगशील.. यावर तिचा विश्वास होता.., म्हणुन तिनं तुला सोडुन जाण्याचा नाटक केले...

आपण काय शिकलो?

 
मी घरी पोहचलो. साडे चार वाजले होते. हातपाय धूवून मी एका हाँटेलमध्ये गेलो. वडापाव संपवून मी चहा घेतला. तेवढ्यात तिथे एक ५०-५५ वर्षाची बाई आली. डोक्यावर भल मोठ जळणाचं ओझ तिनं बाजूला टाकल. कुठेतरी एखादा काळा केस, कपाळावरती मोठी कूंकुवाची छटा. घामामुळे कूंकुवाचा लाल रंग भुवईपर्यत आलेला, धारदार नाक, तंबाखूची मसेरीनं काळवंडलेले दात, सूरकुतलेले हात, तिन-चार जोड देऊन हातानेच शिवलेल नववारी लुगड आणि चोळी असा काही तिचा वेश होता.......
नुस्तच कालावाण मिळल का गं बाई? माझ्याकडं भाकर हाय. तिचा होकार मिळताच काळपट फडक्यातून त्या बाईन शिळी भाकर काढली. आणि दिलेल्या कालावणावर अधाशिपणान खाऊ लागली. मी विचार करीयला लागलो. आपण पैसे द्यावे का? हिला कुणीच नसेल का? आणि असेल तर अशी वेळ का यावी तिच्यावर? इतक्यात तिची भाकरी संपण्याच्या आत ती हाँटेलवाली मुलगी म्हणाली.
आजी, मिसळपाव घ्या. पैसे नाही घेणार! पोरी, आज खाईन पोटभरून पण उदया?
तुम्हाला मुलबाळ नाही का?

त्यावर त्या म्हणाल्या, तसं नाय काय, पोरगा मोठा, सायब हाय, परदेशाला इंजनेर हाय पण त्याला येळच न्हाय! कानाखाली कोणतरी जोराची चरकार मारावी आणि त्याचा आवाज मेंदूपर्यत घुमावा तसे हे शब्द माझ्या कानावर पडले. आणि विचारांच काहूर माजल. 
माणूस इतका बदलतो का? आपल संपूर्ण आयुष्य वाहून घेणा-या या माऊलीची त्याला क्षणभरही आठवण येत नसेल का? आणि सगळच अनुत्तरीत होत. माझी चेहरा खाली घालून मी आता विचार करीत होतो. इतक्यात माझ्या पाठीवर तोच थरथरता हात फिरला. मी वरती पाहील तर तिच बाई मला म्हणाली. इतका विचार करु नकोस बाळा, तुझ्या आई-बापाला निट जप म्हणजे झाल...........

मगतर मेल्याहून मेल्यासारख झाल. मी आता फक्त रडायचाच बाकी होतो. कारण एका क्षणात माझ पूर्ण अंतरंग त्या माऊलीन वाचलं. पण आम्हाला आमच्याच आई-वडीलांच थोडस दु:खसुद्धा कधीच जाणता येत नाही. जिवनाच्या सचोटीत एवढं शिक्षण घेऊनही आम्ही अगदीच अडाणी वाटतो यांच्यासमोर! कुठ शिक्षण घेतल असेल यांनी हे.
सेटलमेंट, न्यूजाँब, इनक्रिमेंट, प्रमोशनच्या घोळात आम्ही ही आमची माणसं कुठ हरवुन बसतो आम्हालाच कळत नाही. डोक जड झाल. मी उठलो आणि चालू लागलो. शेजारच्या जिल्हापरिषेद्येच्या शाळेत मास्तर मूलांना विचारत होते. आपण काय शिकलो? मी मनाशीच उत्तर दिलं, आयुष्यात इंजिनिअर नाही होता आल तरी चालेल पण चांगला, जबाबदार माणूस जरुर व्हायच .................
 

एक होता चिमणा

एक होता चिमणा व एक होती चिमणी..दोघात खूप प्रेम होते.. एके दिवशी चिमणी चिमण्याला म्हणाली.. तू मला सोडून,,उडून तर जाणार नाही ना? ...
...तेंव्हा चिमणा म्हणाला मी जर उडून गेलो तर तू मला पकडून घेशील... चिमणी म्हणाली मी तुला त्यावेळी पकडू तर शकेल पण तुला मिळवू नाही शकणार.. हे ऐकुन चिमण्याचे डोळे भरून आले..

त्याने आपले पंख छाटून टाकले..आणि चिमणीला म्हणाला आता तर ठीक आहेना...आता आपण नेहमी सोबत राहू...

एके दिवशी जोराचे वादळ सुटले..चिमण्याला पंख नसल्याने तो उडू शकत नव्हता.. चिमणी मात्र.. तो चिमणीला म्हणाला तू उडून जा.. चिमणीने त्याला स्वताची काळजी घे असे सांगून उडून गेली.. थोड्या वेळाने वादळ शमले... चिमणी परत आली.. पाहते तर चिमणा मारून पडला होता..

बाजूच्या फांदीवर लिहिले होते.. प्रिये.. फक्त एकदा..एकदाच जर तू मला म्हटले असते कि मी तुला सोडून नाही जाऊ शकत.. तर कदाचित हे वादळ हि माझे काही बिघडवू शकले नसते... प्रेम हे असेच असते.
 
 

Read This Heart Touching Stories