Jayesh Gujrati's Blog (in Marathi): Story

Search

Showing posts with label Story. Show all posts
Showing posts with label Story. Show all posts

Friday, December 04, 2015

Why am I the one to die?

I went to a party Mom, 
I remembered what you said. 
You told me not to drink, Mom, 
So I drank soda instead.


I really felt proud inside, Mom, 
The way you said I would. 
I didn't drink and drive, Mom, 
Even though the others said I should.


I know I did the right thing, Mom, 
I know you are always right. 
Now the party is finally ending, Mom, 
As everyone is driving out of sight.


As I got into my car, Mom, 
I knew I'd get home in one piece. 
Because of the way you raised me, 
So responsible and sweet..



I started to drive away, Mom, 
But as I pulled out into the road, 
The other car didn't see me, Mom, 
And hit me like a load.


As I lay there on the pavement, Mom, 
I hear the policeman say, 
"The other guy is drunk," Mom, 
And now I'm the one who will pay.


I'm lying here dying, Mom.... 
I wish you'd get here soon. 
How could this happen to me, Mom? 
My life just burst like a balloon..


There is blood all around me, Mom, 
And most of it is mine. 
I hear the medic say, Mom, 
I'll die in a short time.





I just wanted to tell you, Mom, 
I swear I didn't drink. 
It was the others, Mom. 
The others didn't think.


He was probably at the same party as I. 
The only difference is, he drank 
And I will die.
 

Why do people drink, Mom? 
It can ruin your whole life. 
I'm feeling sharp pains now. 
Pains just like a knife.
 

The guy who hit me is walking, Mom, 
And I don't think it's fair. 
I'm lying here dying 
And all he can do is stare.
 

Tell my brother not to cry, Mom. 
Tell Daddy to be brave. 
And when I go to heaven, Mom, 
Put "GOOD BOY " on my grave.
 

Someone should have told him, Mom, 
Not to drink and drive. 
If only they had told him, Mom, 
I would still be alive.
 

 My breath is getting shorter, Mom. 
I'm becoming very scared. 
Please don't cry for me, Mom. 
When I needed you, you were always there.




I have one last question, Mom. 
Before I say good bye. 
I didn't drink and drive, 
So why am I the one to die? 



Source : Internet

Friday, March 01, 2013

तू बरोबर असतोस तेव्हा...

तू बरोबर असतोस तेव्हा,
खूप खूप बोलावसं वाटत, नाहीतर फक्त गप्प रहावस वाटत…

तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुलाच पाहावस वाटत, नाहीतर डोळे मिटून शांत बसावस वाटत…
 

 

तू बरोबर असतोस तेव्हा,
खूप खूप हसावसं वाटत,  नाहीतर उदास रहावस वाटत…
 

तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुझ्याच समोर रडावस वाटत, नाहीतर मनात सगळं दुखं, दाबून ठेवावस वाटत…
 

तू बरोबर असतोस तेव्हा,
तुझ्याबरोबर पावसात भिजावस वाटत, नाहीतर खिडकीतूनच, पडता पाऊस पाहावस वाटत…
 


तू बरोबर असतोस तेव्हा,
जगावसं वाटत, नाहीतर जग सोडून जावस वाटत…
 

तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुझ्या बरोबरच रहावस वाटत, नाहीतर फक्त तुलाच आठवावस  वाटत…
 

नाहीतर फक्त तुलाच......
                                            आठवावस वाटत…


by unknown

(Note: Video added to this blog, expecting your comments on this, so I'll continue adding Videos to my next blogs)
 

Friday, February 22, 2013

"अनाथ"

यहीं कहीं, कहीं गहरे सन्नाटे में, ख़ामोश निगाहों ने कुछ कहना चाहा 
लफ्ज न थे जुबान पर, तो बस आँखों  ने ही कुछ समजना चाहा । 

नन्हे हाथों ने उंगली थाम चलना चाहा
नाजुक कदमो ने आगे बढ़ाना चाहा,
रो-रो कर जिद को मनवाना चाहा,  
माँ के हाथों से निवाला और बाबा का दुलार चाहा,
बस अपने लिए छोटा-सा आशियाना चाहा । 

 
पलको ने छुप-छुप कर सब कुछ कहना चाहा,
फिर ना समझ दिल को समझाना चाहा,
आंसू पोछ कर मुस्कुराना चाहा,
कभी मन मार कर सिसक-सिसक कर रोना चाहा,
बस माँ की ममता और बाबा का दुलार चाहा । 

लोरी सुन रातों को सोना चाहा,
गलतियों पर फटकार, फिर आँचल में छुपना  चाहा,
 ममता की धरा मैं बहना, और अमृत को पीना चाहा,
बाबा का हाथ सर पर, और अभिमान से जीना  चाहा । 

उस अहसास को पाना चाहा,
जन्नत मैं जीना चाहा,
खुद को महफूज रखना चाहा,
रूठी माँ को मनाना चाहा,
बाबा के लिए कुछ बनना चाहा । 

पर बेखबर थे जिस सच से, दुनिया ने हमें उससे मिलाना चाहा 
बस... एक लफ्ज , और जिंदगी ने खुद को कोसना चाहा 
जब "अनाथ" कहकर, सबने हमारा दिल दुखाया
जाने क्यूँ हमें इतना रुलाया, फिर इस दिल ने खुद को तनहा पाया...
और खुद से रूठकर  बस...
बस...  ख़ामोश रहना चाहा । 



- by पूनम चौधरी, नासिक 
(या कवितेला "Rainbow Youth Festival 2012" मध्ये "First Prize" मिळाले होते। ) 


 

Thursday, February 21, 2013

जेव्हा मी १५ आणि तू ११ वर्षाची होतीस...

जेव्हा मी १५ आणि तू ११ वर्षाची होतीस... 
मी म्हणलो...
"माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे
तू विचारलस 
"ते काय असत ..?"

... आठवतंय..? 
मी २५ व्या वर्षी तुला म्हणालो 
"मी तुझ्यावर खूप प्रेम करतो..."
तू म्हणालीस...
"मला एकटी तर नाही ना सोडणार..?" आणि अलगद माज्या मिठीत विरघळलीस...!!



३५ व्या वर्षी... जेव्हा एकदा मी रात्री उशिरा घरी आलो... 
तू आणि मी सोबतच डिनर घेतलं... मी तुला जवळ ओढून म्हणालो...
"I love you...!!
तू माझ्या कपाळावर ओठ टेकवत म्हणालीस..
"I know that.." पण सकाळी मुलांचा पेपर आहे... 

उशीर नको व्हायला आता जास्त... आता झोपू यात लवकर...!!

माझ्या ५० व्या वाढदिवशी…

सगळे पार्टी मध्ये गुंग असताना, मी हळूच म्हणालो...
"I love you very much"
तू हसत हसत म्हणालीस ...

"माहित आहे, अगदी २० वर्ष आधी पासून माहित आहे...
आणि पुन्हा तुझ्या विश्वात रंगून गेलीस...!!

तेव्हा मी ६० वर्षाचा झालो होतो...
आपल्या मुलाच्या लग्नात तू घातलेली पैठणी पाहून मी म्हणालो...
"छान दिसतेस..." आणि अलगद तुला जवळ करून म्हणालो... 

"तू मला खूप आवडतेस आणि माझ तुझ्यावर  खूप प्रेम आहे..."
तू मला बाजूला सारत म्हणालीस...
"ते ठीक आहे हो...!! पण सगळ व्यवस्थीत अरेंज झालय ना..?"

मी आत ७५ वर्षाचा... 

आराम खुर्चीवर बसून.... आपला जुना अल्बम बघत होतो...
तू स्वेटर वीणत होतीस... नातवासाठी. मी म्हणालो 

"माझ तुझ्यावर अजून हि तितकच प्रेम आहे ..!"
आणि तू म्हणालीस....

"माझ पण तुझ्यावर आजही तितकच प्रेम आहे जितक तुला होकार देताना होत..."

माझ्या हातातील तो आठवणींचा साठा असलेला अल्बम पूर्ण भिजून गेला...
डोळ्यातून पडणारे थेंब अनावर होत होते... कारण आज इतक्या वर्षांनी... तू हि म्हणाली होतीस कि,

तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस म्हणून...!!

*
*
*
*
*
*
(फक्त प्रेम पुरेसे नसते... कारण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला काहीच नको असत...त्याला ओढ असते ती फक्त ते शब्द ऐकायची जे सांगतात ... "हो माझ पण तितकच प्रेम आहे तुझ्यावर...जितक तुझ माझ्यावर आहे..." म्हणून जेव्हा पण संधी मिळेल सांगायला चुकू नका....तुम्ही सुद्धा प्रेम करतात ते...)

Friday, February 15, 2013

अरे माझ लग्न ठरलं...

आज तिचा फोन आला..
शब्दाऐवजी अश्रूंच्या हुंद्क्याचा आवाज झाला ..

स्वतःला सावरून तिन सांगितलं,

  "अरे माझ लग्न ठरलं..."
 
 



 ती सावरली पण तो क्षणात ढासळला..
अन मग दोघ्यांच्या आसवांपुडे पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला..

शब्द सगळे हवेत विरले...

ती म्हणाली 

"माफ करशील ना रे मला ?? "

तो म्हणाला  

"आपराध्यासारखी माफी का मागतेस?
कर्तव्यपूर्ती  करून तू आई-वडिलांचा मन राखातेस..
या जन्मी नाही झालीस माझी..
तरी पुढच्या जन्मी तुझ्यावर फक्त माझा हक्क असेल...
"

हे ऐकून म्हणाली 

"हृदयाच्या कप्यात आठवनीच्या कोपऱ्यात फक्त तुझी प्रतिमा असेल..."
धीर देऊन त्यान तिचा फोन ठेवला..

कुणाला अश्रू दिसू नयेत म्हणून तो पावसात जाऊन उभा राहिला...

Wednesday, February 13, 2013

हरवले मी स्वर माझे. . .

तो. . . 
वय २५, तसा मुळचा मुंबईचा, पण शिक्षणासाठी पुण्यात जोश्यांकडे राहायचा

ती. . .

वय २२, नृत्य  शिकायची, आई, वडील आणि लहान भावाबरोबर पुण्यातच रहायची
 





तिचा नकार. . .
पण तो तिचं मन वळवण्याच्या प्रयत्नात आजही तिच्या पाठी...

ती घराजवळ पोहोचते, पाठीमागून तो येतच असतो.
शेवटी हतबल होऊन ती

"तुला नक्की हवंय तरी काय?"
"तुझ्या प्रेमाशिवाय दुसरं काय"
"माझ लग्न ठरलंय, निर्णय झालाय"
"तू आनंदी आहेस?"

"हुम्म"
 "नक्की?"
"हुम्म" ती होकारार्थी मन हलवते
मागे वळतो पाठी तिचे बाबा उभे असतात..., त्यांचा गैरसमज..., आणि... डोळ्यावरचा चष्मा खाली पडतो आणि फुटतो... गालावरचा हाथ तसाच राहतो... बाबा तिच्या जवळ येतात आणि दोघे हि नजरे आड होतात... तिला अखेरच बघत... तो नाहीसा होतो... 

अंधार पडू लागतो... रस्त्यात समोरून येणारी गाडी त्याला अस्पष्ट दिसते... अंगावर येणारा प्रकाश... एक निमिष...  आणि मग सर्वत्र अंधार...

 

 दोन महिने उलटतात... फासे हळू हळू पालटू लागतात... दोन दिवसावर लग्न. पण ती गेले दोन दिवस त्याचाच विचार करतेयतिलाही कळत नाहीय अस का होतंय. त्या दिवशी ती बराच वेळ त्या रस्त्यावर ताटकळत उभी होती. आत्ता दिसेल, नंतर दिसेल पण दिसलाच नाही. कॉलेजमध्ये तो बरेच दिवस आलाच नव्हता. जीवाचं काही बर वाईट तर करून नाही ना घेतलं. ती फार बैचेन झाली. शेवटी जोश्यांकडे पोहोचते. त्याच मोठा अपघात झाल्याच कळत. ती त्याचा नंबर घेते. घाबरत घाबरत त्याला फोन लावते. रिंग वाजते. फोनही उचलला जातो. तो तिचा आवाज ओळखतो. ती रडत असते. रडत रडत बोलत असते.

त्याच्या मनात अनेक विचार येऊन जातात. धूसर धूसर अनेक प्रश्न ठेऊन जातात.

तो काहीच बोलत नाही. दोघेही भावनाविवश होतात. तो फोन ठेऊन देतो.
ती फोनकडे बघत राहते. तो बोलला का नाही.

दोन दिवसावर लग्न. . .

आता तिला सगळ असह्य होत चाललंय. त्याला भेटण गरजेच आहे, कोणत्याही परिस्थितीत. ती मुंबईला जाण्याचा निर्णय घेते. त्याच्या घरी पोहोचते. तो आत्ताच पुण्याला निघाल्याच कळत. तातडीने पुण्याची वाल्व्हो पकडते. सीट जवळ येते. आणि जे पाहते त्यावर तिचा विश्वासच बसत नाही.

तो समोर असतो. . .
काही बोलायला तिच्याकडे शब्दच नसतात...

तो एक कागद घेतो... त्याचावर काही तरी गिरवतो आणि तिच्या हातात देतो...
 

हरवले मी स्वर माझे रात्रीत त्या एक...
आहेत गोठले कंठी शब्द ते शब्द अनेक...
भावनेत माझ्या असतील सर्व शब्द...
कळतील तुला का ते बोल.... निशब्द.....

भान हरपते. . .


कंठातील शब्द कंठात कोचणार का...?
प्रेम तुझे शब्दात मोजणार का...? 

कागद निसटतो. . .

आणि दोघ एकमेकांना मिठीत घेत पुढच्या मार्गाला लागतात...


- Unknown 

Sunday, April 29, 2012

प्रेमपत्र

काही गोष्टी अशा असतात, की त्या समोराच्याला सांगायच्या असूनही आपण सांगू शकत नाही. मी माझं प्रेम व्यक्त करायला हवं होतं की नाही, हा प्रश्न मला आजही पडतो. 

तुझं ते येणं, हसणं, माझ्याशी बोलताना घाबरणं, कधीकधी गोंधळणं अजूनही मला सर्व काही आठवतं. तू आल्यावर मला काही सुचायचंच नाही. फक्त तुझ्याकडे बघत राहावं, असं वाटायचं. तू गेल्यावर मैत्रिणीबरोबर मी तुझ्यावर शेरेबाजी करायचे. माझ्या प्रेमाचं गुपित मी मनातच ठेवलं. म्हणतात ना, 'काही नाती असतात अबोलपणे बोलण्याची, मनातल्या मनात जोडून मनातच तोडण्याची...' 


मला अजूनही तुझी पहिली भेट आणि बाकीच्या आठवणी लक्षात आहेत. त्या कधीच विसरू शकणार नाही. ज्या गोष्टी आपण विसरत नाही, त्यालाच तर आठवणी म्हणतात. नंतर मी स्वत:मध्येच हरवू लागले. नेहमी तुझाच विचार करायचे. तुझ्या वागण्यातून मला एक प्रकारचा संकेत मिळायचा. पण वाटायचं, की हा माझा भास तर नाही ना? दोन प्रेमींसारखं आपण कधी वागलोच नाही. एवढंच काय, आपण एकमेकांशी मैत्रीसुद्धा केली नाही. फक्त कामांपुरतंच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बोलणं व्हायचं. आपण दोघं एकमेकांच्या समोर असल्यावर एवढं गोंधळायचो, की काय बोलायचं हे सुचायचंच नाही. मी तुला जितकं विसरायचा प्रयत्न करते, तितकाच तू मला आठवत राहतोस. जेव्हा मला खूप मनापासून वाटत असतं, की तू दिसावास तेव्हा प्रत्यक्षात तू दिसत नाहीस. पण माझ्या ध्यानीमनी नसतानाही अचानक तू मला दिसतोस. असं का होतं? तुला पाहिलं, की माझे डोळे लगेच भरून येतात. आनंदाने की दु:खाने, हे माझं मला समजत नाही. 

जेव्हा मला तुझी गरज होती, तेव्हा तू माझ्यापासून खूप दूर होतास. आजही मला तू हवा आहेस. पण तू माझ्या जवळ नाहीस. कदाचित या वेडीचं नावसुद्धा तुला माहीत नसेल. मला फक्त एकदाच तुला सांगायचं आहे, की मी तुझ्यावर खूप भरपूर, सॉल्लिड... माझ्याकडे शब्दच नाहीत, पण खरंच प्रेम करते.


                                                                              - तुझीच वेडी

Saturday, April 28, 2012

प्रेमात आंधळं होवू नका.....!!!


एक सुंदर पण खूप अबोल मुलगी. वडील पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे दर ३-४ वर्षांमध्ये बदल्या होत असायच्या त्यामुळे ह्या शाळेत ४ वर्ष मग दुसऱ्या शाळेत ३ वर्ष असे करत करत तिचं बीकॉम पर्यंतच शिक्षण झाले. त्यामुळे तिचे मित्र-मैत्रिणी कधीच होवू शकल्या नाहीत. आणि मुळ स्वभावच अबोल असल्यामुळे स्वताहून तिनेही मैत्रीसाठी कुठे हाथ पुढे केला नाही. तिच्या वडलांची शेवटच्या १० वर्षासाठी मुंबई मध्ये बदली झाली. इथे आल्यावर घरात बसून बसून ती खूप कंटाळत असायची म्हणून तिच्या वडलांनी तिला Computer कोरस करायला सांगितला म्हणजे तिचा वेळ पण जाईल आणि थोड शिक्षण पण मिळेल. त्याप्रमाणे त्या एरिया मधेच तिला क्लास लावून दिला. ती नियमित क्लासला जायला लागली. तिथेच तिची ओळख समीरशी झाली. तोही तिथे क्लासला येत होता. समवयस्कर होता त्याने बी.ए. पूर्ण करून तो क्लास लावला होता. तो राहायला पण तिच्या अगदी घराजवळच होता. समीरने तिच्याशी मैत्री केली. दोघेही एकत्र क्लासला यायला जायला लागले. असे करत करत ६ महिने उलटून गेले. आतापर्यंत मैत्री खूप घनिष्ट झाली होती. वेळ साधून समीरने तिला प्रपोज केले. पण वडिलांबद्दल खूप आदर असल्यामुळे त्यांच्या मनाविरुद्ध काही करायची तिची हिम्मत नव्हती, कारण तिच्या वडिलांना तीच लग्न उच्चशिक्षित, आणि भरपूर पगार असलेल्या मुलाशी करून द्यायचं होत. आणि समीर जेमतेम बी ए होता आणि नोकरीचा तर अजून थांगपत्ता नव्हता. त्यामुळे तिने समीरला आपला निर्णय त्यावेळी दिला नाही.


असाच महिना लोटला, आणि अचानक समीरचा फोन आला कि मला नोकरी मिळाली आहे एका आठवड्यात मला बंगलोरला जायचय. आणि मला २५००० पगार मिळणार आहे. आता मी तुझ्यावडीलांशी लग्नाबद्दल बोलू शकतो, सुजाताला खूप आनंद होतो, आणि ती त्याला आपला होकार देवून टाकते. दोन दिवसांनी समीर तिच्या घरी येतो, तिचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. समीर खूप खुश होवून तिच्याशी बोलत होता, नोकरी बद्दल सर्व काही सांगत होता, मी तुझ्या वडिलांशी बोलतो आणि त्यांना सांगतो कि मी सहा महिन्यांनी सुट्टी घेवून परत येईन मग मी सुजाताशी लग्न करेन. तिलाहि खूप आनंद होतो, पण त्या आनंदात काही भलतच घडत, जे घडू नये असे बरेच काही, कारण घरात त्यावेळी ते दोघेच असतात, सुजाता त्यातून भानावर येते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, ती खूप घाबरते आणि रडायला सुरवात करते पण समीर तिची समजूत काढतो तिला समजावतो, काही होणार नाही आपण डॉक्टर कडे जावूया काही होणार नाही, तू काळजी करू नकोस असेही आपले सहा महिन्यातच लग्न होणार आहे. तो तिला मेडिकल मध्ये घेवून जातो, कुठलीतरी एक गोळी देतो तू आता काळजी करू नकोस काही होणार नाही. आणि तो तिला घरात आणून सोडतो आणि आपल्या घरी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा कॉल येतो तो बोलतो कि मला काळ रात्रीच बंगलोरसाठी निघावं लागलाय पण तू तुझ्या वडिलांना सांग कि मी सहा महिन्यात येतो आणि आपण लग्न करणार आहोत असे. ती आधीतर खूप घाबरते पण सर्व धीर एकटवून वडिलांशी बोलते. ते म्हणतात कि ठीक आहे मी त्याची वाट बघतोय, सहा महिन्यांनी त्याला त्याच्या आई-वडिलांना घेवून आपल्या घरी यायला सांग. तिला खूप बर वाटत. ती हि बातमी समीर कॉल करून लगेच देते.

पण पुढच्याच महिन्यात सर्व काही बदलून जात, तिला समजून येत कि ती Pregnant आहे, तिला काय कराव काहीच काळात नसत, आणि नेमके गेले ८ दिवसापासून समीरचा आणि तिचा संपर्क होवू शकला नव्हता. तिने ते सांगण्यासाठी परत त्याला कॉल केला. पण समीरशी काहीकेल्या संपर्क होत नव्हता. ती सारखी रडतच होती, तिने ठरवले कि समीर ज्या ठिकाणी राहत होता तिथे जावून चौकशी करावी. तिथे गेल्यावर पण तिला काहीच माहिती नाही मिळाली. ती तिथेच त्याच्या घराबाहेर रडत बसली. तेवड्यात एक मुलगा तिच्या जवळ आला त्याने तिला विचारले, तिने त्याला समीरबद्दल काही माहिती आहे का असे विचारले. त्याने सांगितले कि तो एक नंबरचा फ्रॉड होता त्याने असेच तुझ्यासारख्या २-३ मुलींना फसवून इथून पळून गेला आहे. तो बंगलोरला नाही तो दिल्लीला असतो. माझ्या एका दुसऱ्या मित्राकडे त्याचा नंबर आहे मी त्याच्याकडून घेवून तुला देतो. आणि त्यामुलाने त्याचा नंबर मिळवून तिला दिला. तीने समीरला कॉल केला, आणि सर्व सांगितले त्याने तीला सांगितले कि जावून abortion कर मला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही आणि परत मला संपर्क करण्याच्या भानगडीत पडू नकोस...कारण हा नंबर यापुढे कधीच चालू नसेल. त्याच्या या उत्तरामुळे ती खूप shock होते आणि तशीच तिथून धावत आपल्या घरी जाते एकदा विचार करते कि घरी सर्व सांगायचं पण वडिलांच्या इज्जतीचा विचार तिच्या मनात येतो आणि ती सरळ आपल्या रूम मध्ये जावून काही कुणाशी न बोलता गळफास लावून घेते.....आणि हे सर्व संपवून टाकते.

सुजाताच आयुष्य तर असाच फुकट गेलं मित्रांनो...पण अशा सुजाता अजून होवू नये ह्याची दक्षता आपण स्वताच घेतली पाहिजे खास करून मुलींनी.

प्रेमात आंधळं होवू नका.....!!!

Wednesday, April 25, 2012

Romantic Propose


तिला ठाऊक होतं ...त्याचं आपल्यावर अतोनात प्रेम आहे
तिचंही होतंच, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच !
दोघंही प्रेम करत होते एकमेकांवर जीवापाड ...
दोघांना ही होती मनापासून याची जाणीव ...
त्यालाही काही विचारायचं होतं,

तिलाही काहीतरी बोलायचं होतं,
पण... दोघांनी सारं मनातच ठेवलं होतं !
शेवटी तिला सुचली एक कल्पना ...
नेहमीप्रमाणे भेटले दोघे एकदा एकांतात ...
ती लाडात येऊन म्हणाली ,
"काल मला एक स्वप्नं पडलं...
स्वप्नात कोणीतरी मला propose केलं..."
"Will you Marry me ?"
त्याने न राहवून विचारलं, "मग उत्तर काय दिलंस ?"
ती म्हणाली "हो शिवाय दुसरं काही सुचलंच नाही"
त्याने उत्सुकतेने विचारलं "कोण होता ? सांगशील का ?"
ती लाजून म्हणाली "वेड्या ! तूच, आणखी कोण ?"
तो खूश झाला, तिचा चेहरा आपल्या हातात धरून म्हणाला
"खरंच ? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं"
ती गालातल्या गालात हसली ... आणि म्हणाली
"हो ..... मलाही !"

Tuesday, April 24, 2012

तुही खुप रडशील

दिवस उजड़त गेला पण विचार काही संपले नाही .
पक्ष्यांचा किलबिलत सुरु झाला पण विचाराना शांतता लाभली नाही.



प्रत्येक सकाळी ठरवते विसरून जाईन तुला.
आणि प्रत्येक रात्री आठवल्याशिवाय झोप नाही येत मला,


कधी हे सगले संपेल कधी ह्या मनाला शांतता मिळेल.
अस वाटत हे आता माझ्या श्वासाबरोबरच थांबेल,

डोळ्यातले अश्रु पुसायची हिम्मत होत नाही .
कारन त्याना पण आता सुकायची सवय झाली.

दोष तुझा नाही माझा आहे,
तुला विसरण्याचा हाच तर एक बहाना आहे,

बहाने लाख मिळाले तुला विसरायचे पण त्याचा उपयोग काही झालाच नाही ,
विसरून जायचे म्हंटले तरीही मन तयार होतच नाही,


राहिले आयुष्य तुझ्या आठवनींच्या नावावर,
खेळ खेळतेय आयुष्याचा शेवटच्या वाटेवर,


मी गेल्यानंतर तुही खुप रडशील.
मग माझ्या आठवनीत तुही तळमळशील.....

Friday, April 20, 2012

का ?... असं नेहमी का घडतं ?

तो अजुनहि झोपलाच होता, वर टांगलेल सलाईन वाऱ्या निशी हालत होत. त्यातून टपकनारे थेँब त्याच्या रक्तात भिनत होते. झोप कसली येत होती त्याला...?? उघड्या डोळ्याने तो एकाच ठिकानी बघत होता. त्याची आई औषधे व गोळ्या घेवून आली, त्याला थोडे फार खाण्याची विनंती केली. 

पण त्याने गप्प राहून नकार दिला,  आई गेल्यानंतर त्याने एका हाताने औषधे व गोळ्या घेतल्या........ .
घड्याळाच्या टोलानीँ त्याचे लक्ष वेधले. सहा वाजले होते, त्याने चटकन चादर बाजूला केली 'अरे बापरे ! क्लास तर संपून गेला असेल' अंगात एवढेही बळ नसताना त्याने हातातली सुई खेचून काढली. भळ-भळनाऱ्या रक्तावर कापसाचा बोळा पकडून तो सायकल जवळ गेला. त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हत. भर पावसात तो सायकल घेवून क्लासकडे गेला. क्लास तर केव्हाच संपून गेला होता. बहूतेक सर्वजण घरी निघून गेले होते थोडी पावसाची भूर-भूर चालूच होती....
 

ती अजूनहि क्लासच्या बाहेर त्याची वाट पाहत उभीच होती. त्याला बघितल्यावर तिचे डोले चमकले. तिला त्याचा राग आला होता, झपझप चालत त्याच्याजवळ पोहचली. त्याच्या डोक्यावर छञी पकडून त्याचा कान धरला, "तू आजारी असताना इथं का आलास ? आणि पून्हा छञी विसरलास, बापरे ! किती पाणी" त्याच्या डोक्यावरून पाणी झटकत ती म्हणाली, "पूर्ण ओला झालाय आणि मग सर्दी झाली म्हणजे मलाच म्हणशिल...... अरे ! किती बडबड करते मी ? जाऊ दे बरं, डाँक्टर काय म्हाणालें तब्येत कशी आहे ?" दोघेही क्लासच्या बाहेर पायरीवर जाऊन बसले.


तो अजूनही काकडत होता. तिच्या डोळ्यामध्ये त्यांचे बावरलेलं मन स्वत:ची खोलवर रूजलेली प्रतिमा शोधत होत. तिचे निरागस डोळे माञ सदैव त्याच्याच चिँतेत बूडालेलेदिसत होते. त्याच्या अतिभोळेपनाची तिला काळजी वाटायची, त्याच्या प्रेमाच्या वेडेपणाची सीमा अजून तिलाही ठरवता आली नव्हती. त्याच्या कपाळावर तिने हात ठेवला आणि ती दचकलीच, "बाप रे ! किती भयंकर ताप आलाय तूला ! अन, तरी तू एवढ्या पावसात मला भेटायला आला? तूला काही झालं म्हणजे? नाही मीच वेडी आहेँ. मीच थांबते ना ! आता मी थांबणारच नाही, तू बघच मी, थांबतच नाही !" असं द्रृष्ट लागण्याजोगे प्रेम बघून त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी जमा झालं, बोलण्याचा प्रयत्न करताच त्याला खोकला आला.


तिने त्याला न बोलण्याची विनंती केली. त्याचा हात आपल्या हातात घेताच, तिने हातावरुन ओघळणारे लाल रक्त बघीतले. ती यावेळी माञ चिडलीच, "तू हे काय केलंस? तू सलाईन काढले ना? का स्वता:ला ञास करून घेतोस? तुला होणाऱ्या वेदना काळजात सूई प्रमाणे घुसतात,जा ! मी बोलणारच नाही. अरे तुला काही झाले म्हणजे मी आणि माझे जीवन..." त्याने तिच्या ओठांवर हात ठेवला.

पुढचे शब्द... काळजाला चिरणारे होते. त्याच्या डोळ्यातून थेँब ओघळला. तिच्या निस्सिम प्रेमासाठी आणि तिच्यासाठी, तरीही त्याच्या डोळ्यातल्या अश्रुनी तिला अस्वस्थ करुन टाकले. तिच्याहि डोळ्यांतून पाणी टपकत होते, "खरच, इतक प्रेम करतोस का रे माझ्यावर...??? मग का असा ञास देतोय ? तुझ्या या वेडेपणानेच मला वेड लावंल-तुझ-तुझ्या प्रेमाचंमी सुध्दा इतकी वेडी आहे ना मी थांबते म्हणून तर तू येतोस. दोघेपण अगदी वेडे आहोत." तिने त्याच्या खांद्यावर मान टेकवली.

तिचे डोके थापटत, तो माञ कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात हरवून गेला होता, तिथे फक्त तिच्या बांगड्यांची किण-किण आणि तिचा आवाज कानी येत होता. तेवढ्यात त्याच्या सरांची थाप त्याच्या पाठीवर पडली, "काय रे ? केव्हाचा आवाज देतोय-काय करतोय इथं एकटा ? एवढ्या पावसात का बसलाय ? घरचे म्हणत होते तू आजारी आहेस म्हणुन" सरांच्या आवाजाने तो भानावर आला.... त्याने मान डोलवली. सर आत निघून गेले.

भरलेल्या डोळ्यानी किँचित मागे वळूनपाहिले. क्लासमध्ये टांगलेल्या तिच्या फोटोची माळ वाऱ्यानिशी हालत होती. ती क्लास मधली एक हूशार विद्यार्थीनी होती...!!! सर्व काही द्रृष्ट लागल्या प्रमाने घडून गेलं होत. स्वप्नाहूनही सुंदर अशा त्यांच्या दुनियेवर काळाने अशी झडप घातली कि त्या दुनियेतील सर्व सुख काळ आपल्या बरोबर घेऊन गेला होता.

फुलांआडून डोकवणाऱ्या तिच्या डोळ्यामध्ये घोर चिँता दिसून येत होती. कोण समजून घेणार माझ्या या वेड्याला ? कोण शिकवणार याला माझ्याशिवाय जगणं? कोणी जपेल का याला माझ्याप्रमाणे ? असे अनेक प्रश्न तिला पडले असावे. त्याचे मन माञ एखाद्या वेड्या हरणाप्रमाणे तिच्या सावलीमागेच पळत होतं, ते हे मानायला तयारच नव्हत की तिच अस्तित्व आता संपलय म्हणून.

असे सावल्यांचे खेळ-आभास त्याच्या जिवनाचा एक भागच बनून गेले होते. ह्रूदयात जपून ठेवलेल्या तिच्या आठवणी अश्रु बनुन क्षणा-क्षणाला बाहेर पडत होत्या. तिची प्रतिमा डोळ्यामध्ये भरून जड अंत:करनाने तो सायकल जवळ गेला. काकडंत- काकडत त्याने सायकल घेतली व घराकडे चालू लागला आणि चालता-चालता बेशुध्द होऊन पडला......

हे सर्व प्रेम होत कि वेड ! मी त्यावेळी हे सारे फार जवळून बघितले होते. का कुणीतरी इतकही प्रेम करू शकत ? हे असं कसं प्रेम होत जे म्रूत्युनंतर सुद्धा जिंवत होत? खरचं त्याच्या वेडे पणाला म्रूत्युच्याही मर्यादा कमी पडल्या होत्या....

या अगोदर तो खुप चांगला असायचा, क्षणोक्षणी त्याच्या चेहऱ्यावर आनंद असायचा, पण त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर हास्य मी पहीलेच नाही.

आता त्याने आपल्या मनावर ताबा मिळवलाय. सर्वाशी तो चांगला वागतो अगदी पूर्वीप्रमाणे. पण फरक एवढाच आहे की तो पूर्वी सर्वाशी बोलु शकत होता. त्यावेळी आजारात त्याने आपली वाचा गमावली होती. त्या दोघांच्या सुखासमोर स्वर्गसूद्धा फिका पडत असावा म्हणुन देवालाही हेवा वाटला आणि...

जेथे खरोखर चांगल घडत असतं तेथेच नशिब तोकडे पडते हा प्रश्न तर फार पूर्वीपासून अनुत्तरीतच आहे... असं नेहमी का घडतं ?...का ?

 

Tuesday, April 10, 2012

प्रेमविवाह

मी यंदाच्या सुट्टीत माझ्या काकांच्या घरी गेलो होतो. त्याचं घर गावापासून थोडस दूर आहे. काकांचा दुधाचा व्यवसाय आहे, तिथेच त्यांच्या कडे काम करत असलेल्या मुलाची हि कथा आहे. 

त्या मुलाच एका मुलीवर खूप प्रेम होत आणि त्यामुलीच सुद्धा. दोघेही एकाच जातीचे होते पण दोघांच्याही घरातून त्यांच्या लग्नसाठी विरोध होता. ज्यादिवशी मुलीच्या घरच्यांना त्याच्या बद्दल कळाले तेव्हा त्यांनी त्या मुलाला खूप मार मार मारले आणि गावाच्या बाहेर नेवून फेकून दिले. मुलाच नशिब  चांगल म्हणून तो बिचारा कसाबसा त्यातून वाचला. त्याच्या घरच्यांनी त्याला दुसऱ्या एका लांब गावात आपल्या नातेवायकांकडे उपचारासाठी आणून ठेवले. दोन महिन्यात तो बरा झाला, पण त्याला तिच्याशीच लग्न  करायचं होत. 


त्याने तिला संपर्क केला आणि त्या दोघांच असे ठरले कि गावात त्या मुलाच्या मित्रांची मदत घेवून तिथून पळून जायचं. पण एक मोठी अडचण हि होती कि त्या मुलीला १८ वर्ष पूर्ण होण्यासाठी ३ महिने बाकी होते. त्या मुलाच्या मित्राने त्याला एक कल्पना सुचवली. तुम्ही इथून पळून जा, देवळात लग्न करा आणि तीन महिने मी सांगतो त्या ठिकाणी लपून राहा. माझ्या ओळखीच एक गृहस्थ आहेत ज्यांचा दूधाच व्यवसाय आहे आणि त्याचं घर सुद्धा गावापासून थोड लांब आहे. (ते म्हणजे माझे काका) तू त्यांच्या कडे नोकरी कर ते तुला माझ्या सांगण्यावर राहायला एखाध छोटास घर पण देतील आणि तुला नोकरी पण. 

ठरल्या प्रमाणे सर्व झाल देवळात लग्न करून त्या दोघांना त्याचा तो मित्र माझ्या काकांकडे घेवून आला. सर्व प्रकार सांगितला काकांनी राहायला घर आणि नोकरी पण दिली, ती मुलगी पण शिकलेली होती त्यामुळे तिनेही काकांच्या मुलाचा HOMEWORK घ्यायचं काम केल. पण त्यादिवशी प्रकरण काही वेगळाच वाटत होत. मी घरातून बाहेर बघितल तर तो मुलगा आणि ती मुलगी दोघ खूप टेन्शन मध्ये दिसत होती मुलगातर खूप घाबरला होता.  आणि ती मुलगी खाली मन घालून उभी होती. ते दोघ माझ्या काकांशी काही बोलत होते. 

काकांना विचारल्यावर मला कळाले कि मुलीच्या घरच्यांनी त्या मुला विरुद्ध तक्रार नोंदवली पोलीस स्टेशनमध्ये, पोलिसांनी तपास करत त्या मुलाचा शोध लावला ज्याने त्या दोघांना पळण्यात मदत करून काकांकडे आणून सोडले होते. त्याची कसून चौकशी केली त्याला खूप मारल पण तरीही त्या मुलाने आपले तोंड नाही उघडले. पोलीस त्याला सतत त्रास देतच होते. पण त्या मुलाच्या सासूला माहित होते कि आपल्या जावयाने त्या दोघांना कुठे लपवून ठेवलेय ते. पोलीस सारखे आपल्या जावयाला त्रास देतायत हे पाहून तिने पोलिसांना खर काय ते सांगून टाकले होते. ह्याच सर्व टेन्शन मुळे ते घाबरले होते. पोलीस कधीही तिथे पोचले असते. त्यामुळे काका आणि काकांचा मोठा मुलगा दोघाही विचारात पडले होते त्या मुलीला १८ पूर्ण व्हायला अजून एक महिना बाकी होता. अजून एकाच महिना कसातरी लपून राहायचा होता. तितक्यात काकांना एक मित्राच घर आठवले जे औरंगाबादला होते. काकांनी त्यांना सांगितले कि तुम्ही आताच्या आता तिकडे निघा मी माझ्या मित्राला फोन करून सांगतो. तो तुमची सर्व सोय करेल एक महिना तिथे थांबा मग मी तुमच लग्न लावून देयीन आणि मग इथेच राहा माझ्याकडे. 

पण ते दोघेही खूप घाबरले होते अजूनही. त्यांनी कपडे भरले ब्यागेत आणि मीच त्यांना सोडायला गेलो त्यांना ST पकडून स्टेशनला जायचे होते आणि तिथून रात्रीच्या ट्रेनने औरंगाबादला. मी त्यांना माझ्याकडून जमेल तितक धीर देण्याचा प्रयत्न केला निघताना. खूप समजावलं आणि अजिबात टेन्शन घेवू नका आम्ही सर्व तुमच्या बाजूने आहोत सांगितले आणि निरोप घेवून मी निघालो. मी घरी त्यांना सोडून संध्याकाळी घरी आलो....आम्ही सर्व त्यांच्या बद्दलच विचार करत बसलो होतो. नंतर रात्री जेवायच्या वेळेस आम्ही एकत्र जेवायला बसलो पण काका जेवायला नाही आले. म्हणाले मी नंतर बसतो तुम्ही जेवा. 

आमच जेवून झाल्या वर मी काकांकडे आलो जेवायला काकी बोलावते आहे हा निरोप घेवून पण पाहतो तर काका रडत होते मी सर्वांना बोलावले सर्वजण काकांना विचारात होते कि नक्की काय झालाय तुम्ही का रडत आहात. काका म्हणाले रेल्वे पोलीस स्टेशन  मधून फोन आला होता, एका झोडप्याने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केलीय. त्या मुलाच्या खिशात तुमच विझिटिंग कार्ड मिळाल, म्हणून कॉल केला जर तुम्ही ह्यांना ओळखत असाल तर लवकर स्टेशनला या. आम्ही सर्व सुन्न झालो काका काकी आणि सर्वच खूप रडत होतो. नंतर आम्ही स्टेशनला गेलो. प्रत्येक्षदर्शिने सांगितले कि ते रात्री ८ वाजल्या पासून प्लाटफार्म वर  बसले होते आणि एकमेकांच्या मिठीत सारखे रडत होते, आणि खूप घाबरलेले होते त्यांना औरंगाबादला जायचं असे तो मुलगा एकदा बोलला. पण अजून काही बोलत नव्हते ते दोघ. आणि नंतर अचानक काय झाले आणि एक फास्ट एक्स्प्रेसच्या समोर त्यांनी धावत जावून उडी मारली. आणि सर्व काही संपल. मला तर काहीच समजत नव्हते.....अजून काय करायला पाहिजे होते म्हणजे ते दोघ सुखी झाले असते. माझी खूप इच्चा होती कि त्यांचा सुखाच संसार व्हावा. पण नियतीला ते मान्य नव्हते. 

मूळ कथा - अलोक अकसे

Friday, April 06, 2012

Challenge

एकदा एक मुलगा त्याच्या प्रेयसीला Challenge करतो कि, 
"एक पूर्ण दिवस तू माझ्याशिवाय राहून दाखवायचे, मला फोन, मैल, मेसेज काहीही करायचे नाही,जर तू अस करून दाखविलेस तर मी तुझ्याशी लगेच लग्न करेन ........!!!"

मुलगी म्हणाली, 
"खरे तर मला एक क्षण सुद्धा तुझ्या शिवाय राहायचे नाहीये, पण तरीही आज तू मला Challenge केले आहेस म्हणून मी एक पूर्ण दिवस काहीही Contact न करण्याचे Challenge स्वीकारत आहे !"
 

एक पूर्ण दिवस काहीही contact न करता जातो.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ती मुलगी खूप उत्सुकतेने त्या मुलाला भेटायला त्याच्या घरी जाते. पण, घरात पोहोचताच ती तिच्या प्रियकराची पांढर्या-शुभ्र कापडात ठेवलेली व वरती हार घातलेली body बघते आणि तिला एकदम मोठा धक्का बसतो. तिला हे अस कस झाले ???, का झाले ????? काहीच कळत नव्हते... रडावे तर अश्रूंचा पूर येईल, शांत तर राहातच येत नव्हते... कंठ दाटून आलेला... सर्व आठवणी डोळ्यासमोर एक क्षणात उभ्या राहिल्या...

तेव्हड्यात त्याच्या आईने त्याने तिच्यासाठी लिहिलेली चिठ्ठी  तिच्याकडे दिली त्यात लिहिले होते, "कर्करोगाच्या आजरामुळे माझ्या कडे शेवटचा एकच दिवस राहिला होता म्हणून मला तुला Challenge करावे लागले... आणि तू ते करून दाखविलेस. आता फक्त हेच तुला रोज करायचे आहे... माझ्यासाठी...!!!"

Friday, March 23, 2012

No Problem...!!!


Eskimos.....  no problem.......  short story

Eskimos who live in poles always lead a life of happiness and they never say there is a problem in their life. feeling jealous of this, the  people living in nearby towns pledged to make an Eskimo say he has a problem.


They kidnapped an Eskimo and tied his eyes with black cloth and took him to a steep hill and at  the peak removed the black cloth.

When the Eskimo tried to find out where he was standing he could find a deep valley in front of him and found himself at the tip of the deadly point.  People behind him then asked him if he is now in a problem but the Eskimo  said "No". They then told him if he is prepared to accept there is a problem they will release him failing which they will push him into the deep valley and he had no chance of survival.

The Eskimo again replied that he had no problem. When they asked how he could say this when his life is at danger, the Eskimo replied "If I am pushed into the valley I am going to die and I will have no problem. If you change your decision and leave me free, I will be back to my place and I will have no problem"

The villagers found the reality of life and let him go.

I wish you an Eskimo life for you which means a no problem life

Saturday, March 17, 2012

तो एक भिकारी होता...

तो एक भिकारी होता...
लहानपणापासूनच गणपती मंदीरासमोर बसायचा...
येणार्‍या-जाणार्‍याकडे आशाळभूत नजरेने पहायचा...
त्याचा आवाज खूप चांगला होता...
सुरेल आवाजात भक्तीगीतं गायचा...
स्वतःला विसरुन सुरांमध्ये तल्लीन होऊन जायचा...
ती मंदीराजवळच रहायची...
दर मंगळवारी न चुकता मंदीरात यायची...
या मुलाचं तिला विशेष कौतुक वाटायचं...
त्याच्या आवाजातील कारुण्य, तिच्या मनात दाटायचं...
एकदा जाऊन ती त्याच्याशी बोलली...
एकमेकांच्या नकळत, त्यांची मैत्री फुलली...

आता, ती रोज मंदीरात येऊ लागली...
त्याच्यासोबत अखंड गप्पा मारु लागली...
तिनं त्याला लिहायला, वाचायला शिकवलं...
त्यानेही सगळं झटकन आत्मसात केलं...
हळूहळू त्याच्या पंखांना पालवी फुटू लागली...
त्याच्या मनात तिच्याविषयी प्रीत मग दाटू लागली...
त्यानं ठरवलं, स्वतःच्या पायावर उभं रहायचं...
आणि मग कर्तृत्वाच्या जोरावर, तिला मिळवायचं...
वर्ष सरत होती... काळ सरकत होता...
त्याच्या मनात प्रेमाचा अवीट झरा झरत होता...
मग एके दिवशी त्याने, शहरात जायचं ठरवलं...
संगीताच्या विश्वात, नशीब कमवायचं ठरवलं...
तिला न भेटताच, तो शहरात निघून आला...
आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, जोमानं लढू लागला...
रोज भर उन्हात, पायी रखडत जायचा...
मान्यवर संगीतकारांचे उंबरे झिजवायचा...
पण त्याला कधीच कोणी संधी दिली नाही...
त्याच्या गुणांची कोणी कदरच केली नाही...
दिवस उलटत होते, पण त्याचा निर्णय पक्का होता...
स्वतःच्या कर्तृत्वावर, त्याचा विश्वास सच्चा होता...
आणि एके दिवशी, ती सुवर्णसंधी चालून आली...
गायकीच्या स्पर्धेसाठी, प्रवेशिका त्यानं दिली...
त्याच्या आवजाला तिथं वाखाणलं गेलं...
त्याच्या गुणांचे मोल, खरोखर जाणलं गेलं...
आणि मग त्याच्यातील गायकाचा उदय झाला...
त्याच्या तेजाने मग, तो विश्व उजळून गेला...
किर्ती,प्रसिद्धी,पैसा,प्रतिष् tha सर्व त्याला मिळाले...
तरीही त्याचे मन, केवळ तिच्याचसाठी तळमळले...
तिची आठवण येताच, तो गावाकडे परतला...
जाऊन तिच्या घराच्या, अंगणात उभा राहीला...
पण हे काय? ते घर अगदी उदास भासत होते...
कोणते तरी दुःख, त्या घरास ग्रासत होते...
आत पाऊल टाकताच, त्याच्या ह्रदयात धस्स झाले...
मनातल्या स्वप्नांचे डोलारे, क्षणार्धात लुप्त झाले...
तिचा फुलांच्या हारने सजलेला फोटो,
त्याच्या ह्रदयात बाणासारखा शिरला...
अन् यशाच्या शिखरावर पोहोचुनही,
शेवटी तो एक भिकारीच उरला.........

Tuesday, March 13, 2012

मैत्र जीवांचे

कधी कुठुन तो येईल आणि कचकचुन चावेल याचा नेम नव्हता. अख्खी रात्र अशीच घाबरत, या कुशीवरुन त्या कुशीवर काढली. झोप अनावर झाली होती पण.. खोलीत कुठेतरी तो आहेच... या नुसत्या कल्पनेनेही अंगावर काटा उभा राहीला होता. त्या पुर्वी त्याला इतक्या स्पष्ट, जवळ कधीच पाहीला नव्हता. पण काल रात्री मात्र.... एकाचे दोन.. दोनाचे चार... मग मात्र मला आणि माझ्या मैत्रीणीला हातात चप्पल घ्यावी लागली. 
 इतक्या महिन्यानंतर गप्पा रंगात आलेल्या असताना रंगाचा भंग करायला तो अचानकच कुठुन तरी यायचा. पहाटे पाच-सहा पर्यंत हा चोर-पोलिसाचा खेळ चालुच होता. माझ्या आयुष्यात मी त्याला काल प्रथमच पाहिलं. पण रात्रभर त्याला आणि त्याच्या फ़ौजेला शोधाशोधीच्या त्रासाचीही नंतर गंमत वाटु लागली. सकाळी पाच - सहा नंतर मात्र तो आणि त्याची फ़ौज बहुदा दमुन झोपली. तसंही बर्याच जणांची आम्ही रात्रभर पाण्यात टाकुन, चप्पलेने वगैरे कत्तलच केली होती. पण पहाटे पर्यंत आम्ही लढवलेली खिंड उद्या नक्कीच "पेस्ट कंट्रोल" वाल्या काकांच्या हाती द्यायची असं एकमताने ठरवुन... "ढेकुणां" बरोबरची लढाई आम्ही संपवली.
माझं घर कोकणात असल्यामुळे, जन्मापासुन १८-१९ वर्षांत घरातील, उंदीर, घुस, पाल, डोंगळे, आधेलं, विंचु, इंगळी, गोम (घोण), नाकतोडा, रातकिडा, वेगवेगळे किटक..इत्यादी प्राण्या-पक्ष्यांशी दोस्ती झाली होती. वेगवेगळ्या ऋतुंमध्ये ही मंडळी हमखास घरी भेटायला यायची. अजुनही पेस्ट कंट्रोल नावाचा प्रकार तिकडे वापरात आला नसल्यामुळे... आलेल्यांचं स्वागत आणि गेलेल्यांचे आभार मानुन सगळे गुण्यागोविंदाने राहात होतो. (पाहुण्यांसाठीही हेच लागु होतं.) पण या आमच्या ग्रुपमध्ये "ढेकुण" मात्र नव्हता. काल एकदाची त्याचीही चांगलीच ओळख झाली. "घर आमचं पण आहे!" हे वाक्य हे सगळेजण वारंवार मला जाणवुन देतात. तेव्हा... "नांदा पण सुखाने आणि जगा व जगु द्या!" हे एकच वाक्य म्हणण्याशिवाय गत्यंतर राहात नाही.


(सुचना: पुर्ण आयुष्य शहराच्या झगमगाटात आणि फ़िनाईल ने पुसलेल्या चकचकीत फ़रशांवर गेलेल्या व्यक्तींना कदाचित हे वर्णन रुचणार नाही. परंतु, कोकणातील शेणाने सारवलेल्या जमीनींना, मातीने लिंपलेल्या भिंतींना आणि तिथल्या घरगुती प्राणीसंग्रहालयाला ज्यांनी अनुभवलं आहे.. अशांना नक्कीच हे सर्व प्राणी ’मैत्र जीवांचे!" वाटतील यात शंका नाही.)
 
by-मुग्धा माईणकर

Saturday, March 10, 2012

First Gear

त्या दिवशी गाडी चालवत होतो. मुंबईत गाडी चालवायची म्हणजे क्लचब्रेक आणि गिअर बरोबर झटापट ही आलीच. बदलत जाणारे गिअर्स आणि त्यामुळे बदलत जाणारा गाडीचा वेग यावरून एक कल्पना सुचली. 

गाडी सुरु झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण 'फर्स्ट गिअरटाकतो. हा 'फर्स्ट गिअरम्हणजे आपल्या जवळची सख्खी माणसं. आई-बाबाजोडीदारमुलंजवळचे मित्र...


हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. मुंगीच्या गतीने का होईना गाडी न थांबता 'पुढेजात राहिली पाहिजे हा पहिला 'संस्कारफर्स्ट गिअर करतो.



इथे आपल्याला unconditional प्रेम मिळतंसुरक्षितता मिळते. गाडी 'बंद पडणार नाहीयाची पुरेपूर काळजी हा फर्स्ट गिअर घेतो. परंतु गाडी 'पळण्यासाठीइतका कमी वेग पुरेसा नसतो.
आपण गाडीचा वेग वाढवतो. सेकंड गिअर टाकतो ! इथे आपल्याला घराबाहेरचं विश्व कळू लागतं.

शाळा कॉलेजपुस्तकंमिडियाआपले छंदविविध कला..... बाहेरचं जग किती मोठं आहे आणि माहिती आणि ज्ञानामुळे हेच मोठं जग किती जवळ आलं आहेहे कळतं.
समोर पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू लागतो. गाडीचा वेग आणखी वाढवण्यासाठी आपण आता थर्ड गिअर टाकतो. गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड गिअर म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून मिळणारं विना-खंडित उत्पन्न. गरजे पुरतं घरकपडा लत्ताभांडीकुंडीपहिला फ्रीजपहिला टीव्हीप्रसंगानुरूप हॉटेलिंगसणासुदीला नवीन कपडेचांगले मार्क मिळाले तर मुलाला/मुलीला सायकल वगैरे थर्ड गिअरमध्ये येतं. या गिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग ना कमी ना जास्त. सेकंड मधून थर्ड गिअर मध्ये आलो तेव्हा वेग जास्त होता हे मान्यपण आता तोच वेग कमी वाटू लागतो.
आपण आता 'फोर्थ गिअरटाकतो. गाडी सुसाट निघते. मनात आलं की हॉटेलिंग-शॉपिंग-मल्टीप्लेक्सगाडी, latest मोबाईल, 1 BHK मधून 2 BHK, laptop, ह्याउ नि त्याउ..!

या वेगाची नशाच काही और! गम्मत म्हणजे आपण पाचव्या गिअर मध्ये कधी जातो हे आपल्यालाच कळत नाही...आता गाडी अक्षरश: तरंगत जात असते. हजार... लाख... कोटी... खर्व.... निखर्व......रुपये नाहीतगरजा! हा 'वेगखूप आनंददायी असतो. आपल्या गाडीच्या आड कोणी येऊ नये, 'लालसिग्नल लागू नये असं मनोमन वाटत असतं....
आणि... आणि.....आणि...

... 'नियतीनावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो. तो खूप प्रचंड असतो.
गाडी थांबवण्यावाचून आता पर्याय नसतो. पाच.. चार.. तीन..दोन...एक.... खाट खाट गिअर मागे टाकत आपण आता neutral वर येतो. कचकावून ब्रेक लागतात. गाडी पूर्ण थांबते. आपल्या अंगाला खूप मोठा झटका बसतो.
पाचव्या गिअर मध्ये गाडी असताना आपण कधी काळी फर्स्ट गिअर देखील टाकला होता याचा विसर पडला होता. वरचा प्रत्येक गिअर टाकताना त्या गिअरची अशी एक मानसिकता होती...
आज एक एक गिअर मागे येताना हे पहिल्यांदा जाणवलं. 

गाडी आता पूर्ण थांबली आहे. गाडी आता पुढे न्यायची आहे.. मला सांगा कुठला गिअर टाकाल ?

सुसाट वेगाचा पाचवा गिअर की मुंगीच्या वेगाचा पण गाडी चालू ठेवेल असा 'फर्स्ट गिअर' ?

आयुष्यात जेव्हा पराभवाचेनिराशेचे क्षण आले होतेतेव्हा कोण होतं तुमच्या जवळकोणी दिला होता आधार आठवून पहा. प्लाज्मा टीव्हीने ?

EMI भरत विकत घेतलेल्या extra बेडरूमनेनव्या कोऱ्या गाडीने ? 'You are promoted' असं लिहिलेल्या कागदाने ?
मी सांगतो कोण होतं तुमच्याजवळ. तुम्हाला आधार दिला होता फर्स्ट गिअरने !
आर्थिक अडचणीच्या वेळी आपल्या उशाखाली नोटांचं पुडकं हळूच ठेवून जाणारे बाबानिरागस प्रश्न विचारून आपल्या चिंता घालवणारी आपली चिमुरडी मुलं, 'होईल सगळं व्यवस्थितम्हणत डोक्याला बाम चोळून देणारी 'बायकोनावाची मैत्रीणबाहेरचं खाऊन त्रास होऊ नये म्हणून पहाटे उठून पोळी भाजीचा डबा बनवणारी आई, 'त्याकाळात आपल्या frustration चा 'कानहोणारे आणि योग्य सल्ला देणारे जिवाभावाचे मित्र हे सगळे फर्स्ट गिअर तुमची गाडी ओढत नव्हते का ?
Don't get me wrong. माझा चवथ्या-पाचव्या गिअर्सना आक्षेप नाही. त्या वेगाची धुंदी जरूर अनुभवूया. त्याचा आनंदही उपभोगुया. फक्त त्यावेळी आपल्या 'फर्स्ट गिअर्सचं स्मरण ठेवूया.
आयुष्याचा वेग मधून मधून थोssडा कमी करत पुन्हा एकदा फर्स्ट गिअरवर येऊया.
सुसाट वेगाचा 'arrogance' इथे नाही... गाडी थोडी हळू चालेल हे मान्य. 'फर्स्ट गिअरचंअस्तित्व लक्षात घ्यावंच लागेल असा हा वेग असेल. 
त्या निवांतपणाशी थोडं खेळूया आणि मग टाकूया पुढचा गिअर !
जाता जाता आणखी एक.
स्वत:लाच एक प्रश्न विचारूया - दुसऱ्या कुणाच्या आयुष्याचा मी बनू शकेन का 'फर्स्ट गिअर' ?

Read This Heart Touching Stories