Jayesh Gujrati's Blog (in Marathi): Life

Search

Showing posts with label Life. Show all posts
Showing posts with label Life. Show all posts

Friday, March 01, 2013

तू बरोबर असतोस तेव्हा...

तू बरोबर असतोस तेव्हा,
खूप खूप बोलावसं वाटत, नाहीतर फक्त गप्प रहावस वाटत…

तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुलाच पाहावस वाटत, नाहीतर डोळे मिटून शांत बसावस वाटत…
 

 

तू बरोबर असतोस तेव्हा,
खूप खूप हसावसं वाटत,  नाहीतर उदास रहावस वाटत…
 

तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुझ्याच समोर रडावस वाटत, नाहीतर मनात सगळं दुखं, दाबून ठेवावस वाटत…
 

तू बरोबर असतोस तेव्हा,
तुझ्याबरोबर पावसात भिजावस वाटत, नाहीतर खिडकीतूनच, पडता पाऊस पाहावस वाटत…
 


तू बरोबर असतोस तेव्हा,
जगावसं वाटत, नाहीतर जग सोडून जावस वाटत…
 

तू बरोबर असतोस तेव्हा,
फक्त तुझ्या बरोबरच रहावस वाटत, नाहीतर फक्त तुलाच आठवावस  वाटत…
 

नाहीतर फक्त तुलाच......
                                            आठवावस वाटत…


by unknown

(Note: Video added to this blog, expecting your comments on this, so I'll continue adding Videos to my next blogs)
 

Tuesday, February 26, 2013

माँ...


एक माँ थी जिसका एक लड़का था, बाप मर चुका था। माँ घरो में बर्तन मांजती थी बेटे को अपना पेट काटकर एक अच्छे अंग्रेजी स्कूल में पढ़ाती थी। एक दिन स्कूल में किसी बच्चे ने उसके लड़के के आँख में पेंसिल मार दी, लड़के की आँख चली गई। डाक्टर ने कहा ये आँख नहीं बचेगी दूसरी लगेगी। तो माँ ने अपने कलेजे के टुकड़े के लिए अपनी एक आँख दे दी। 


अब वो देखने में भी अच्छी नहीं थी। बेटा उसको स्कूल आने को मना करता था क्योंकि वो देखने में अच्छी और पढ़ी लिखी नहीं थी ऊपर से एक आँख भी नहीं रही, उसे अपनी माँ पर शर्म आती थी, कभी लंच बॉक्स देने आती भी थी तो मुह छुपा कर और अपने को नौकरानी बताती थी। अपने बच्चे की ख्वाइश पूरी करने को वो दिन रात काम करती लेकिन बेटे को कमी महसूस नहीं होने देती।

बेटा जवान हुआ, एक  सरकारी अधिकारी बना उसने लव मैरिज की। उसने अपनी माँ को भी नहीं बुलाया और अलग घर ले बीबी के साथ रहने लगा माँ बूढी हो रही थी बीमार भी रहने लगी। लेकिन लड़का अपनी पत्नी और हाई सोसाइटी में व्यस्त रहने लगा उसे माँ की याद भी नहीं आती थी।
 

माँ बीमार रहती लेकिन दिन रात अपने पुत्र की सम्रद्धि और उन्नति के लिए भगवान् से दुआ  मांगती रहती कुछ पडोसी माँ का ख्याल रखते। एक बार वो बहुत बीमार पड़ी तो उसने अपने बेटे को देखने की इच्छा जाहिर की लोग लड़के को बुलाने गए तो, वो अपनी बीबी के साथ कहीं टूर पे घुमने जा रहा था वो नहीं आया उसने कुछ पैसे इलाज़ के लिए भेज दिए, लेकिन माँ का इलाज़ तो उसका बेटा था जिसको मरने से पहले देखना चाहती थी उसे प्यार देना चाहती थी, वो फिर भी बेटे का इन्तेजार करती रही, उसके कलेजे का टुकड़ा उसके आशाओं के टुकड़े कर रहा था। 

वो आया लेकिन तब तक माँ मर चुकी थी उसके हाथ में एक फोटो था लड़के का वही बचपन की स्कूल ड्रेस बाला फोटो धुन्दला गन्दा सा जिसे हर वक्त सीने से लगाये रहती थी, आज भी सीने से लगाये थी, लेकिन मरते दम तक वो अपने कलेजे के टुकड़े को कलेजे से न लगा सकी।

दिन बीते वक्त बदला लड़के का कार से एक्सिडेंट हुआ इस एक्सिडेंट में उसकी दोनों आँख चली गई चेहरे पर चोट लगने से कुरूप लगने लगा दोनों पैर बेकार हो गए चलने में लचार हो गया। पत्नी अमीर घर की लड़की थी, वो दिनों दिन पति से दूर होने लगी क्योंकि पति अब भद्दा और विकलांग था, और एक दिन वो पति को छोड़ कर चली गई। 

तब बेटे को माँ की याद आयी ,की कैसे उसने अपने बेटे के लिए अपनी एक आँख दे दी जीवन के आखरी समय तक वो उसकी फोटो को सीने से लगाये रही, और वो उसको अपनी पत्नी और हाई सोसाइटी के लिए माँ को याद भी नहीं करता था आज ईश्वर ने उसे बता दिया की माँ का प्यार असीम होता है, निस्वार्थ होता है, दुनिया में उससे ज्यादा प्यार करने बाला कोई नहीं ,वो लेटे लेटे यही सोंच रहा था और रो रहा था की ईश्वर ने शायद माँ के प्यार की क़द्र न करने की सजा दी लेकिन शायद माँ स्वर्ग में भी उसकी इस हालत को देख तड़प उठी होगी 

"माँ" जीवन का अनमोल और निस्वार्थ प्यार है किसी और के प्यार के लिए उसे मत ठुकराना।

 

Friday, February 22, 2013

"अनाथ"

यहीं कहीं, कहीं गहरे सन्नाटे में, ख़ामोश निगाहों ने कुछ कहना चाहा 
लफ्ज न थे जुबान पर, तो बस आँखों  ने ही कुछ समजना चाहा । 

नन्हे हाथों ने उंगली थाम चलना चाहा
नाजुक कदमो ने आगे बढ़ाना चाहा,
रो-रो कर जिद को मनवाना चाहा,  
माँ के हाथों से निवाला और बाबा का दुलार चाहा,
बस अपने लिए छोटा-सा आशियाना चाहा । 

 
पलको ने छुप-छुप कर सब कुछ कहना चाहा,
फिर ना समझ दिल को समझाना चाहा,
आंसू पोछ कर मुस्कुराना चाहा,
कभी मन मार कर सिसक-सिसक कर रोना चाहा,
बस माँ की ममता और बाबा का दुलार चाहा । 

लोरी सुन रातों को सोना चाहा,
गलतियों पर फटकार, फिर आँचल में छुपना  चाहा,
 ममता की धरा मैं बहना, और अमृत को पीना चाहा,
बाबा का हाथ सर पर, और अभिमान से जीना  चाहा । 

उस अहसास को पाना चाहा,
जन्नत मैं जीना चाहा,
खुद को महफूज रखना चाहा,
रूठी माँ को मनाना चाहा,
बाबा के लिए कुछ बनना चाहा । 

पर बेखबर थे जिस सच से, दुनिया ने हमें उससे मिलाना चाहा 
बस... एक लफ्ज , और जिंदगी ने खुद को कोसना चाहा 
जब "अनाथ" कहकर, सबने हमारा दिल दुखाया
जाने क्यूँ हमें इतना रुलाया, फिर इस दिल ने खुद को तनहा पाया...
और खुद से रूठकर  बस...
बस...  ख़ामोश रहना चाहा । 



- by पूनम चौधरी, नासिक 
(या कवितेला "Rainbow Youth Festival 2012" मध्ये "First Prize" मिळाले होते। ) 


 

Thursday, February 21, 2013

जेव्हा मी १५ आणि तू ११ वर्षाची होतीस...

जेव्हा मी १५ आणि तू ११ वर्षाची होतीस... 
मी म्हणलो...
"माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे
तू विचारलस 
"ते काय असत ..?"

... आठवतंय..? 
मी २५ व्या वर्षी तुला म्हणालो 
"मी तुझ्यावर खूप प्रेम करतो..."
तू म्हणालीस...
"मला एकटी तर नाही ना सोडणार..?" आणि अलगद माज्या मिठीत विरघळलीस...!!



३५ व्या वर्षी... जेव्हा एकदा मी रात्री उशिरा घरी आलो... 
तू आणि मी सोबतच डिनर घेतलं... मी तुला जवळ ओढून म्हणालो...
"I love you...!!
तू माझ्या कपाळावर ओठ टेकवत म्हणालीस..
"I know that.." पण सकाळी मुलांचा पेपर आहे... 

उशीर नको व्हायला आता जास्त... आता झोपू यात लवकर...!!

माझ्या ५० व्या वाढदिवशी…

सगळे पार्टी मध्ये गुंग असताना, मी हळूच म्हणालो...
"I love you very much"
तू हसत हसत म्हणालीस ...

"माहित आहे, अगदी २० वर्ष आधी पासून माहित आहे...
आणि पुन्हा तुझ्या विश्वात रंगून गेलीस...!!

तेव्हा मी ६० वर्षाचा झालो होतो...
आपल्या मुलाच्या लग्नात तू घातलेली पैठणी पाहून मी म्हणालो...
"छान दिसतेस..." आणि अलगद तुला जवळ करून म्हणालो... 

"तू मला खूप आवडतेस आणि माझ तुझ्यावर  खूप प्रेम आहे..."
तू मला बाजूला सारत म्हणालीस...
"ते ठीक आहे हो...!! पण सगळ व्यवस्थीत अरेंज झालय ना..?"

मी आत ७५ वर्षाचा... 

आराम खुर्चीवर बसून.... आपला जुना अल्बम बघत होतो...
तू स्वेटर वीणत होतीस... नातवासाठी. मी म्हणालो 

"माझ तुझ्यावर अजून हि तितकच प्रेम आहे ..!"
आणि तू म्हणालीस....

"माझ पण तुझ्यावर आजही तितकच प्रेम आहे जितक तुला होकार देताना होत..."

माझ्या हातातील तो आठवणींचा साठा असलेला अल्बम पूर्ण भिजून गेला...
डोळ्यातून पडणारे थेंब अनावर होत होते... कारण आज इतक्या वर्षांनी... तू हि म्हणाली होतीस कि,

तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस म्हणून...!!

*
*
*
*
*
*
(फक्त प्रेम पुरेसे नसते... कारण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला काहीच नको असत...त्याला ओढ असते ती फक्त ते शब्द ऐकायची जे सांगतात ... "हो माझ पण तितकच प्रेम आहे तुझ्यावर...जितक तुझ माझ्यावर आहे..." म्हणून जेव्हा पण संधी मिळेल सांगायला चुकू नका....तुम्ही सुद्धा प्रेम करतात ते...)

Friday, February 15, 2013

अरे माझ लग्न ठरलं...

आज तिचा फोन आला..
शब्दाऐवजी अश्रूंच्या हुंद्क्याचा आवाज झाला ..

स्वतःला सावरून तिन सांगितलं,

  "अरे माझ लग्न ठरलं..."
 
 



 ती सावरली पण तो क्षणात ढासळला..
अन मग दोघ्यांच्या आसवांपुडे पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला..

शब्द सगळे हवेत विरले...

ती म्हणाली 

"माफ करशील ना रे मला ?? "

तो म्हणाला  

"आपराध्यासारखी माफी का मागतेस?
कर्तव्यपूर्ती  करून तू आई-वडिलांचा मन राखातेस..
या जन्मी नाही झालीस माझी..
तरी पुढच्या जन्मी तुझ्यावर फक्त माझा हक्क असेल...
"

हे ऐकून म्हणाली 

"हृदयाच्या कप्यात आठवनीच्या कोपऱ्यात फक्त तुझी प्रतिमा असेल..."
धीर देऊन त्यान तिचा फोन ठेवला..

कुणाला अश्रू दिसू नयेत म्हणून तो पावसात जाऊन उभा राहिला...

Thursday, February 14, 2013

एकतर्फी प्रेमाचा विचार करशील?

मी तुज्या वर प्रेम करायला थकणार नाही...
मी तुजी काळजी घ्यायचे कधी सोडणार नाही.. 

तू माज्यावर प्रेम करत नाही, म्हणून काय झाले..
मी तुज्यावर जीवापाड प्रेम करतो..
हे तुला मान्य करावेच लागेल..



तुला मी तितकासा आवडत नसलो.., म्हणून काय झाले .. 
मी तुज्याशिवाय जगू शकणार नाही ..
हे तुला समजावेच लागेल.. 


मी तुज्या येण्याची वाट पाहून थकणार नाही..
तू येशील आणि हि आशा कधी सोडणार नाही.. 


तुला माज्या भावना कळत नसतील, म्हणून काय झाले...
मी समजेन तुजी मजबुरी..
तुला माज्याशिवाय जगता येत असले, म्हणून काय झाले...
मी समजेन माझी प्रेम कहाणी अधुरी.. 


मी तुला समजावता समजावता थकणार नाही ..
माजे मन तुला समजल्याशिवाय राहणार नाही .. 


मी तुला आयुष्यभर समजावत राहीन..

पण एकदा तरी...
या एकतर्फी प्रेमाचा विचार करशील?
मी तुज्या खुशीसाठी तुला सोडेन ..

 

पण एकदा तरी...
या प्रेमवेड्याला मनात आणशील?



by unknown

Wednesday, February 13, 2013

हरवले मी स्वर माझे. . .

तो. . . 
वय २५, तसा मुळचा मुंबईचा, पण शिक्षणासाठी पुण्यात जोश्यांकडे राहायचा

ती. . .

वय २२, नृत्य  शिकायची, आई, वडील आणि लहान भावाबरोबर पुण्यातच रहायची
 





तिचा नकार. . .
पण तो तिचं मन वळवण्याच्या प्रयत्नात आजही तिच्या पाठी...

ती घराजवळ पोहोचते, पाठीमागून तो येतच असतो.
शेवटी हतबल होऊन ती

"तुला नक्की हवंय तरी काय?"
"तुझ्या प्रेमाशिवाय दुसरं काय"
"माझ लग्न ठरलंय, निर्णय झालाय"
"तू आनंदी आहेस?"

"हुम्म"
 "नक्की?"
"हुम्म" ती होकारार्थी मन हलवते
मागे वळतो पाठी तिचे बाबा उभे असतात..., त्यांचा गैरसमज..., आणि... डोळ्यावरचा चष्मा खाली पडतो आणि फुटतो... गालावरचा हाथ तसाच राहतो... बाबा तिच्या जवळ येतात आणि दोघे हि नजरे आड होतात... तिला अखेरच बघत... तो नाहीसा होतो... 

अंधार पडू लागतो... रस्त्यात समोरून येणारी गाडी त्याला अस्पष्ट दिसते... अंगावर येणारा प्रकाश... एक निमिष...  आणि मग सर्वत्र अंधार...

 

 दोन महिने उलटतात... फासे हळू हळू पालटू लागतात... दोन दिवसावर लग्न. पण ती गेले दोन दिवस त्याचाच विचार करतेयतिलाही कळत नाहीय अस का होतंय. त्या दिवशी ती बराच वेळ त्या रस्त्यावर ताटकळत उभी होती. आत्ता दिसेल, नंतर दिसेल पण दिसलाच नाही. कॉलेजमध्ये तो बरेच दिवस आलाच नव्हता. जीवाचं काही बर वाईट तर करून नाही ना घेतलं. ती फार बैचेन झाली. शेवटी जोश्यांकडे पोहोचते. त्याच मोठा अपघात झाल्याच कळत. ती त्याचा नंबर घेते. घाबरत घाबरत त्याला फोन लावते. रिंग वाजते. फोनही उचलला जातो. तो तिचा आवाज ओळखतो. ती रडत असते. रडत रडत बोलत असते.

त्याच्या मनात अनेक विचार येऊन जातात. धूसर धूसर अनेक प्रश्न ठेऊन जातात.

तो काहीच बोलत नाही. दोघेही भावनाविवश होतात. तो फोन ठेऊन देतो.
ती फोनकडे बघत राहते. तो बोलला का नाही.

दोन दिवसावर लग्न. . .

आता तिला सगळ असह्य होत चाललंय. त्याला भेटण गरजेच आहे, कोणत्याही परिस्थितीत. ती मुंबईला जाण्याचा निर्णय घेते. त्याच्या घरी पोहोचते. तो आत्ताच पुण्याला निघाल्याच कळत. तातडीने पुण्याची वाल्व्हो पकडते. सीट जवळ येते. आणि जे पाहते त्यावर तिचा विश्वासच बसत नाही.

तो समोर असतो. . .
काही बोलायला तिच्याकडे शब्दच नसतात...

तो एक कागद घेतो... त्याचावर काही तरी गिरवतो आणि तिच्या हातात देतो...
 

हरवले मी स्वर माझे रात्रीत त्या एक...
आहेत गोठले कंठी शब्द ते शब्द अनेक...
भावनेत माझ्या असतील सर्व शब्द...
कळतील तुला का ते बोल.... निशब्द.....

भान हरपते. . .


कंठातील शब्द कंठात कोचणार का...?
प्रेम तुझे शब्दात मोजणार का...? 

कागद निसटतो. . .

आणि दोघ एकमेकांना मिठीत घेत पुढच्या मार्गाला लागतात...


- Unknown 

Wednesday, August 01, 2012

शाळा VS कोलेज


शाळा: पेन्सिल,रबर, शार्पनर, पेन, पट्टी....


कोलेज: एक बॉलपेन (तो पण मित्राकडून घेतलेला) ...

शाळा: वर्गात येण्याआधी "टीचर , मे आय कम इन?" किंवा "टीचर ,मी आत येवू का?"

कोलेज: वर्गाजवळ येणार किती बसलेत ते बघणार आणि मोबयील कानाला लावून परत जाणार .

शाळा: सर्व विषयांची पुस्तक आणि वह्या स्वतःजवळ ठेवणार !



 

कोलेज: मित्राला बोलणार "अरे यार वहिचे एक पान तर दे ना"

शाळा: शाळेत पेपर लवकर देवून निघाला तर सर्व बोलणार काय स्कॉलर आहे हा यार

कोलेज: कोलेज मध्ये सर्व बोलणार "काही येत नाही त्याला म्हणून निघालाय"

शाळा: शाळेत उशिरा आले कि शेवटच्या बाकावर बसावे लागते

कोलेज: कोलेज मध्ये उशिरा आले कि पहिल्या बाकावर बसावे लागते

शाळा: यार मला ती आवडते

कोलेज: साभाळून बघ रे..... वहिनी आहे तुझी....

Thursday, May 03, 2012

तो बाप असतो


बाळंतपण झाल्यावर ,धावपळ करतो
औषध घेतो ,चहा,कॉफ्फी आणतो
पैश्याची जुळवाजुळव करतो
तो बाप असतो



सगळ्यांना ने आण करतो
स्वयंपाक हि करतो
सिजरीन नंतर बायकोला त्रास नको ,
म्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो

तो बाप असतो
 

चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो

तो बाप असतो

कॉलेज मध्ये सोबत जातो, होस्टेल शोधतो
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो

तो बाप असतो

स्वतः टपरा मोबाईल वापरून, तुम्हाला stylish मोबाईल घेऊन देतो
तुमच्या प्रीपेड चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो

तो बाप असतो

love marriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप ओरडतो
"बाबा तुम्हाला काही समजत का?" अस ऐकल्यावर खूप रडतो
 तो बाप असतो
 

जाताना पोरगी सासरी,धायमोकळून रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
तो बाप असतो

Sunday, April 29, 2012

प्रेमपत्र

काही गोष्टी अशा असतात, की त्या समोराच्याला सांगायच्या असूनही आपण सांगू शकत नाही. मी माझं प्रेम व्यक्त करायला हवं होतं की नाही, हा प्रश्न मला आजही पडतो. 

तुझं ते येणं, हसणं, माझ्याशी बोलताना घाबरणं, कधीकधी गोंधळणं अजूनही मला सर्व काही आठवतं. तू आल्यावर मला काही सुचायचंच नाही. फक्त तुझ्याकडे बघत राहावं, असं वाटायचं. तू गेल्यावर मैत्रिणीबरोबर मी तुझ्यावर शेरेबाजी करायचे. माझ्या प्रेमाचं गुपित मी मनातच ठेवलं. म्हणतात ना, 'काही नाती असतात अबोलपणे बोलण्याची, मनातल्या मनात जोडून मनातच तोडण्याची...' 


मला अजूनही तुझी पहिली भेट आणि बाकीच्या आठवणी लक्षात आहेत. त्या कधीच विसरू शकणार नाही. ज्या गोष्टी आपण विसरत नाही, त्यालाच तर आठवणी म्हणतात. नंतर मी स्वत:मध्येच हरवू लागले. नेहमी तुझाच विचार करायचे. तुझ्या वागण्यातून मला एक प्रकारचा संकेत मिळायचा. पण वाटायचं, की हा माझा भास तर नाही ना? दोन प्रेमींसारखं आपण कधी वागलोच नाही. एवढंच काय, आपण एकमेकांशी मैत्रीसुद्धा केली नाही. फक्त कामांपुरतंच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बोलणं व्हायचं. आपण दोघं एकमेकांच्या समोर असल्यावर एवढं गोंधळायचो, की काय बोलायचं हे सुचायचंच नाही. मी तुला जितकं विसरायचा प्रयत्न करते, तितकाच तू मला आठवत राहतोस. जेव्हा मला खूप मनापासून वाटत असतं, की तू दिसावास तेव्हा प्रत्यक्षात तू दिसत नाहीस. पण माझ्या ध्यानीमनी नसतानाही अचानक तू मला दिसतोस. असं का होतं? तुला पाहिलं, की माझे डोळे लगेच भरून येतात. आनंदाने की दु:खाने, हे माझं मला समजत नाही. 

जेव्हा मला तुझी गरज होती, तेव्हा तू माझ्यापासून खूप दूर होतास. आजही मला तू हवा आहेस. पण तू माझ्या जवळ नाहीस. कदाचित या वेडीचं नावसुद्धा तुला माहीत नसेल. मला फक्त एकदाच तुला सांगायचं आहे, की मी तुझ्यावर खूप भरपूर, सॉल्लिड... माझ्याकडे शब्दच नाहीत, पण खरंच प्रेम करते.


                                                                              - तुझीच वेडी

Saturday, April 28, 2012

प्रेमात आंधळं होवू नका.....!!!


एक सुंदर पण खूप अबोल मुलगी. वडील पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे दर ३-४ वर्षांमध्ये बदल्या होत असायच्या त्यामुळे ह्या शाळेत ४ वर्ष मग दुसऱ्या शाळेत ३ वर्ष असे करत करत तिचं बीकॉम पर्यंतच शिक्षण झाले. त्यामुळे तिचे मित्र-मैत्रिणी कधीच होवू शकल्या नाहीत. आणि मुळ स्वभावच अबोल असल्यामुळे स्वताहून तिनेही मैत्रीसाठी कुठे हाथ पुढे केला नाही. तिच्या वडलांची शेवटच्या १० वर्षासाठी मुंबई मध्ये बदली झाली. इथे आल्यावर घरात बसून बसून ती खूप कंटाळत असायची म्हणून तिच्या वडलांनी तिला Computer कोरस करायला सांगितला म्हणजे तिचा वेळ पण जाईल आणि थोड शिक्षण पण मिळेल. त्याप्रमाणे त्या एरिया मधेच तिला क्लास लावून दिला. ती नियमित क्लासला जायला लागली. तिथेच तिची ओळख समीरशी झाली. तोही तिथे क्लासला येत होता. समवयस्कर होता त्याने बी.ए. पूर्ण करून तो क्लास लावला होता. तो राहायला पण तिच्या अगदी घराजवळच होता. समीरने तिच्याशी मैत्री केली. दोघेही एकत्र क्लासला यायला जायला लागले. असे करत करत ६ महिने उलटून गेले. आतापर्यंत मैत्री खूप घनिष्ट झाली होती. वेळ साधून समीरने तिला प्रपोज केले. पण वडिलांबद्दल खूप आदर असल्यामुळे त्यांच्या मनाविरुद्ध काही करायची तिची हिम्मत नव्हती, कारण तिच्या वडिलांना तीच लग्न उच्चशिक्षित, आणि भरपूर पगार असलेल्या मुलाशी करून द्यायचं होत. आणि समीर जेमतेम बी ए होता आणि नोकरीचा तर अजून थांगपत्ता नव्हता. त्यामुळे तिने समीरला आपला निर्णय त्यावेळी दिला नाही.


असाच महिना लोटला, आणि अचानक समीरचा फोन आला कि मला नोकरी मिळाली आहे एका आठवड्यात मला बंगलोरला जायचय. आणि मला २५००० पगार मिळणार आहे. आता मी तुझ्यावडीलांशी लग्नाबद्दल बोलू शकतो, सुजाताला खूप आनंद होतो, आणि ती त्याला आपला होकार देवून टाकते. दोन दिवसांनी समीर तिच्या घरी येतो, तिचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. समीर खूप खुश होवून तिच्याशी बोलत होता, नोकरी बद्दल सर्व काही सांगत होता, मी तुझ्या वडिलांशी बोलतो आणि त्यांना सांगतो कि मी सहा महिन्यांनी सुट्टी घेवून परत येईन मग मी सुजाताशी लग्न करेन. तिलाहि खूप आनंद होतो, पण त्या आनंदात काही भलतच घडत, जे घडू नये असे बरेच काही, कारण घरात त्यावेळी ते दोघेच असतात, सुजाता त्यातून भानावर येते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते, ती खूप घाबरते आणि रडायला सुरवात करते पण समीर तिची समजूत काढतो तिला समजावतो, काही होणार नाही आपण डॉक्टर कडे जावूया काही होणार नाही, तू काळजी करू नकोस असेही आपले सहा महिन्यातच लग्न होणार आहे. तो तिला मेडिकल मध्ये घेवून जातो, कुठलीतरी एक गोळी देतो तू आता काळजी करू नकोस काही होणार नाही. आणि तो तिला घरात आणून सोडतो आणि आपल्या घरी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा कॉल येतो तो बोलतो कि मला काळ रात्रीच बंगलोरसाठी निघावं लागलाय पण तू तुझ्या वडिलांना सांग कि मी सहा महिन्यात येतो आणि आपण लग्न करणार आहोत असे. ती आधीतर खूप घाबरते पण सर्व धीर एकटवून वडिलांशी बोलते. ते म्हणतात कि ठीक आहे मी त्याची वाट बघतोय, सहा महिन्यांनी त्याला त्याच्या आई-वडिलांना घेवून आपल्या घरी यायला सांग. तिला खूप बर वाटत. ती हि बातमी समीर कॉल करून लगेच देते.

पण पुढच्याच महिन्यात सर्व काही बदलून जात, तिला समजून येत कि ती Pregnant आहे, तिला काय कराव काहीच काळात नसत, आणि नेमके गेले ८ दिवसापासून समीरचा आणि तिचा संपर्क होवू शकला नव्हता. तिने ते सांगण्यासाठी परत त्याला कॉल केला. पण समीरशी काहीकेल्या संपर्क होत नव्हता. ती सारखी रडतच होती, तिने ठरवले कि समीर ज्या ठिकाणी राहत होता तिथे जावून चौकशी करावी. तिथे गेल्यावर पण तिला काहीच माहिती नाही मिळाली. ती तिथेच त्याच्या घराबाहेर रडत बसली. तेवड्यात एक मुलगा तिच्या जवळ आला त्याने तिला विचारले, तिने त्याला समीरबद्दल काही माहिती आहे का असे विचारले. त्याने सांगितले कि तो एक नंबरचा फ्रॉड होता त्याने असेच तुझ्यासारख्या २-३ मुलींना फसवून इथून पळून गेला आहे. तो बंगलोरला नाही तो दिल्लीला असतो. माझ्या एका दुसऱ्या मित्राकडे त्याचा नंबर आहे मी त्याच्याकडून घेवून तुला देतो. आणि त्यामुलाने त्याचा नंबर मिळवून तिला दिला. तीने समीरला कॉल केला, आणि सर्व सांगितले त्याने तीला सांगितले कि जावून abortion कर मला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही आणि परत मला संपर्क करण्याच्या भानगडीत पडू नकोस...कारण हा नंबर यापुढे कधीच चालू नसेल. त्याच्या या उत्तरामुळे ती खूप shock होते आणि तशीच तिथून धावत आपल्या घरी जाते एकदा विचार करते कि घरी सर्व सांगायचं पण वडिलांच्या इज्जतीचा विचार तिच्या मनात येतो आणि ती सरळ आपल्या रूम मध्ये जावून काही कुणाशी न बोलता गळफास लावून घेते.....आणि हे सर्व संपवून टाकते.

सुजाताच आयुष्य तर असाच फुकट गेलं मित्रांनो...पण अशा सुजाता अजून होवू नये ह्याची दक्षता आपण स्वताच घेतली पाहिजे खास करून मुलींनी.

प्रेमात आंधळं होवू नका.....!!!

Wednesday, April 25, 2012

Romantic Propose


तिला ठाऊक होतं ...त्याचं आपल्यावर अतोनात प्रेम आहे
तिचंही होतंच, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच !
दोघंही प्रेम करत होते एकमेकांवर जीवापाड ...
दोघांना ही होती मनापासून याची जाणीव ...
त्यालाही काही विचारायचं होतं,

तिलाही काहीतरी बोलायचं होतं,
पण... दोघांनी सारं मनातच ठेवलं होतं !
शेवटी तिला सुचली एक कल्पना ...
नेहमीप्रमाणे भेटले दोघे एकदा एकांतात ...
ती लाडात येऊन म्हणाली ,
"काल मला एक स्वप्नं पडलं...
स्वप्नात कोणीतरी मला propose केलं..."
"Will you Marry me ?"
त्याने न राहवून विचारलं, "मग उत्तर काय दिलंस ?"
ती म्हणाली "हो शिवाय दुसरं काही सुचलंच नाही"
त्याने उत्सुकतेने विचारलं "कोण होता ? सांगशील का ?"
ती लाजून म्हणाली "वेड्या ! तूच, आणखी कोण ?"
तो खूश झाला, तिचा चेहरा आपल्या हातात धरून म्हणाला
"खरंच ? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं"
ती गालातल्या गालात हसली ... आणि म्हणाली
"हो ..... मलाही !"

Tuesday, April 24, 2012

तुही खुप रडशील

दिवस उजड़त गेला पण विचार काही संपले नाही .
पक्ष्यांचा किलबिलत सुरु झाला पण विचाराना शांतता लाभली नाही.



प्रत्येक सकाळी ठरवते विसरून जाईन तुला.
आणि प्रत्येक रात्री आठवल्याशिवाय झोप नाही येत मला,


कधी हे सगले संपेल कधी ह्या मनाला शांतता मिळेल.
अस वाटत हे आता माझ्या श्वासाबरोबरच थांबेल,

डोळ्यातले अश्रु पुसायची हिम्मत होत नाही .
कारन त्याना पण आता सुकायची सवय झाली.

दोष तुझा नाही माझा आहे,
तुला विसरण्याचा हाच तर एक बहाना आहे,

बहाने लाख मिळाले तुला विसरायचे पण त्याचा उपयोग काही झालाच नाही ,
विसरून जायचे म्हंटले तरीही मन तयार होतच नाही,


राहिले आयुष्य तुझ्या आठवनींच्या नावावर,
खेळ खेळतेय आयुष्याचा शेवटच्या वाटेवर,


मी गेल्यानंतर तुही खुप रडशील.
मग माझ्या आठवनीत तुही तळमळशील.....

Friday, April 20, 2012

का ?... असं नेहमी का घडतं ?

तो अजुनहि झोपलाच होता, वर टांगलेल सलाईन वाऱ्या निशी हालत होत. त्यातून टपकनारे थेँब त्याच्या रक्तात भिनत होते. झोप कसली येत होती त्याला...?? उघड्या डोळ्याने तो एकाच ठिकानी बघत होता. त्याची आई औषधे व गोळ्या घेवून आली, त्याला थोडे फार खाण्याची विनंती केली. 

पण त्याने गप्प राहून नकार दिला,  आई गेल्यानंतर त्याने एका हाताने औषधे व गोळ्या घेतल्या........ .
घड्याळाच्या टोलानीँ त्याचे लक्ष वेधले. सहा वाजले होते, त्याने चटकन चादर बाजूला केली 'अरे बापरे ! क्लास तर संपून गेला असेल' अंगात एवढेही बळ नसताना त्याने हातातली सुई खेचून काढली. भळ-भळनाऱ्या रक्तावर कापसाचा बोळा पकडून तो सायकल जवळ गेला. त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हत. भर पावसात तो सायकल घेवून क्लासकडे गेला. क्लास तर केव्हाच संपून गेला होता. बहूतेक सर्वजण घरी निघून गेले होते थोडी पावसाची भूर-भूर चालूच होती....
 

ती अजूनहि क्लासच्या बाहेर त्याची वाट पाहत उभीच होती. त्याला बघितल्यावर तिचे डोले चमकले. तिला त्याचा राग आला होता, झपझप चालत त्याच्याजवळ पोहचली. त्याच्या डोक्यावर छञी पकडून त्याचा कान धरला, "तू आजारी असताना इथं का आलास ? आणि पून्हा छञी विसरलास, बापरे ! किती पाणी" त्याच्या डोक्यावरून पाणी झटकत ती म्हणाली, "पूर्ण ओला झालाय आणि मग सर्दी झाली म्हणजे मलाच म्हणशिल...... अरे ! किती बडबड करते मी ? जाऊ दे बरं, डाँक्टर काय म्हाणालें तब्येत कशी आहे ?" दोघेही क्लासच्या बाहेर पायरीवर जाऊन बसले.


तो अजूनही काकडत होता. तिच्या डोळ्यामध्ये त्यांचे बावरलेलं मन स्वत:ची खोलवर रूजलेली प्रतिमा शोधत होत. तिचे निरागस डोळे माञ सदैव त्याच्याच चिँतेत बूडालेलेदिसत होते. त्याच्या अतिभोळेपनाची तिला काळजी वाटायची, त्याच्या प्रेमाच्या वेडेपणाची सीमा अजून तिलाही ठरवता आली नव्हती. त्याच्या कपाळावर तिने हात ठेवला आणि ती दचकलीच, "बाप रे ! किती भयंकर ताप आलाय तूला ! अन, तरी तू एवढ्या पावसात मला भेटायला आला? तूला काही झालं म्हणजे? नाही मीच वेडी आहेँ. मीच थांबते ना ! आता मी थांबणारच नाही, तू बघच मी, थांबतच नाही !" असं द्रृष्ट लागण्याजोगे प्रेम बघून त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी जमा झालं, बोलण्याचा प्रयत्न करताच त्याला खोकला आला.


तिने त्याला न बोलण्याची विनंती केली. त्याचा हात आपल्या हातात घेताच, तिने हातावरुन ओघळणारे लाल रक्त बघीतले. ती यावेळी माञ चिडलीच, "तू हे काय केलंस? तू सलाईन काढले ना? का स्वता:ला ञास करून घेतोस? तुला होणाऱ्या वेदना काळजात सूई प्रमाणे घुसतात,जा ! मी बोलणारच नाही. अरे तुला काही झाले म्हणजे मी आणि माझे जीवन..." त्याने तिच्या ओठांवर हात ठेवला.

पुढचे शब्द... काळजाला चिरणारे होते. त्याच्या डोळ्यातून थेँब ओघळला. तिच्या निस्सिम प्रेमासाठी आणि तिच्यासाठी, तरीही त्याच्या डोळ्यातल्या अश्रुनी तिला अस्वस्थ करुन टाकले. तिच्याहि डोळ्यांतून पाणी टपकत होते, "खरच, इतक प्रेम करतोस का रे माझ्यावर...??? मग का असा ञास देतोय ? तुझ्या या वेडेपणानेच मला वेड लावंल-तुझ-तुझ्या प्रेमाचंमी सुध्दा इतकी वेडी आहे ना मी थांबते म्हणून तर तू येतोस. दोघेपण अगदी वेडे आहोत." तिने त्याच्या खांद्यावर मान टेकवली.

तिचे डोके थापटत, तो माञ कुठल्यातरी वेगळ्याच विश्वात हरवून गेला होता, तिथे फक्त तिच्या बांगड्यांची किण-किण आणि तिचा आवाज कानी येत होता. तेवढ्यात त्याच्या सरांची थाप त्याच्या पाठीवर पडली, "काय रे ? केव्हाचा आवाज देतोय-काय करतोय इथं एकटा ? एवढ्या पावसात का बसलाय ? घरचे म्हणत होते तू आजारी आहेस म्हणुन" सरांच्या आवाजाने तो भानावर आला.... त्याने मान डोलवली. सर आत निघून गेले.

भरलेल्या डोळ्यानी किँचित मागे वळूनपाहिले. क्लासमध्ये टांगलेल्या तिच्या फोटोची माळ वाऱ्यानिशी हालत होती. ती क्लास मधली एक हूशार विद्यार्थीनी होती...!!! सर्व काही द्रृष्ट लागल्या प्रमाने घडून गेलं होत. स्वप्नाहूनही सुंदर अशा त्यांच्या दुनियेवर काळाने अशी झडप घातली कि त्या दुनियेतील सर्व सुख काळ आपल्या बरोबर घेऊन गेला होता.

फुलांआडून डोकवणाऱ्या तिच्या डोळ्यामध्ये घोर चिँता दिसून येत होती. कोण समजून घेणार माझ्या या वेड्याला ? कोण शिकवणार याला माझ्याशिवाय जगणं? कोणी जपेल का याला माझ्याप्रमाणे ? असे अनेक प्रश्न तिला पडले असावे. त्याचे मन माञ एखाद्या वेड्या हरणाप्रमाणे तिच्या सावलीमागेच पळत होतं, ते हे मानायला तयारच नव्हत की तिच अस्तित्व आता संपलय म्हणून.

असे सावल्यांचे खेळ-आभास त्याच्या जिवनाचा एक भागच बनून गेले होते. ह्रूदयात जपून ठेवलेल्या तिच्या आठवणी अश्रु बनुन क्षणा-क्षणाला बाहेर पडत होत्या. तिची प्रतिमा डोळ्यामध्ये भरून जड अंत:करनाने तो सायकल जवळ गेला. काकडंत- काकडत त्याने सायकल घेतली व घराकडे चालू लागला आणि चालता-चालता बेशुध्द होऊन पडला......

हे सर्व प्रेम होत कि वेड ! मी त्यावेळी हे सारे फार जवळून बघितले होते. का कुणीतरी इतकही प्रेम करू शकत ? हे असं कसं प्रेम होत जे म्रूत्युनंतर सुद्धा जिंवत होत? खरचं त्याच्या वेडे पणाला म्रूत्युच्याही मर्यादा कमी पडल्या होत्या....

या अगोदर तो खुप चांगला असायचा, क्षणोक्षणी त्याच्या चेहऱ्यावर आनंद असायचा, पण त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर हास्य मी पहीलेच नाही.

आता त्याने आपल्या मनावर ताबा मिळवलाय. सर्वाशी तो चांगला वागतो अगदी पूर्वीप्रमाणे. पण फरक एवढाच आहे की तो पूर्वी सर्वाशी बोलु शकत होता. त्यावेळी आजारात त्याने आपली वाचा गमावली होती. त्या दोघांच्या सुखासमोर स्वर्गसूद्धा फिका पडत असावा म्हणुन देवालाही हेवा वाटला आणि...

जेथे खरोखर चांगल घडत असतं तेथेच नशिब तोकडे पडते हा प्रश्न तर फार पूर्वीपासून अनुत्तरीतच आहे... असं नेहमी का घडतं ?...का ?

 

Friday, April 13, 2012

गोल्ड मेडल

दोघं एकाच शाळेत आणि मग एकाच कॉलेज मधे होते. इतक्या वर्षांची छान मैत्री होती दोघांची.

ती - दिसायला अतिशय सुंदर, सतत बोलणारी, सतत हसणारी, खूप हुषार.

... तो - अतिशय साधा, गप्प-गप्प राहणारा, अगदी चार-चौघांसारखा.
...

सतत बरोबर असायचे दोघं - अभ्यास, खेळ, सिनेमा, पिकनिक, टाइम-पास - काहीही असो - ना ती कधी त्याला बोलवायला विसरायची, ना तो कधी तिला सोडुन कुठे जायचा.. खरं म्हणजे ती त्याला हक्कानेच बोलवायची.. आणि त्याला तिला सोडुन कुठे एकटं जाणं शक्यच नव्हतं.."अरे! आज मला युनिव्हरसिटीत थोडं काम आहे. येतोस का बरोबर?"


असा नुसता तिचा फोन आला.. आणि तो जेवण अर्धवट सोडुन तसाच बाईक घेऊन तिच्या घरी पोचला. त्याची आई म्हणतच राहिली त्याच्या पाठीमागे, "अरे, निदान जेवण तरी संपव..." पण त्याला कुठे भान होता... 

बाईकवर ती नेहमी त्याच्याच मागे बसायची. आणि तो ही दुसऱ्या कुठल्या मैत्रिणीला मागे बसु द्यायचा नाही. 

ती दमली असेल तर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवायची. तीचे केस वाऱ्यानी उडायचे, हलकेच त्याच्या गालवर 

बसुन त्याला गुदगुली व्हायची.

लहानपणापासुनच दोघं एकत्र असल्याने दोघांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं.

तिचं एक स्वप्न होतं - तिला युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल हवं होतं. त्या करता ती मेहनतही तशी घेत होती. तास न तास अभ्यास करत होती. सोबतीला तो बसुन रहायचा. तिला झोप येऊ नये, तिचं concentration राहावं म्हणुन रात्री तिला तिची आवडती कॉफी करुन द्यायचा. तिचा वेळ नको वाया जायला म्हणुन तिच्या करता नोट्स, पेपर्स झेरॉक्स करुन आणायचा.

परीक्षा झाली. निकाल लागले. त्याला फर्स्ट क्लास मिळाला. त्याच्या करता तो खरं जास्तीच होता. आणि ती? 

तिचं स्वप्न पूर्ण झालं. तिला गोल्ड मेडल मिळालं..


त्या दिवशी संध्याकाळी ती भेटली त्याला.

हातात एक लाल गुलाबाचं फुल होतं तिच्या.

तो प्रचंड खुष होता - फर्स्ट क्लास करता नाही, तर तिला गोल्ड मेडल मिळालं म्हणुन.

"आज मी खूप खुष आहे. एक गंमत झाली.

तुला विनय आठवतोय? दादाचा बेस्ट फ्रेंड? अमेरीकेला असतो गेले २ वर्ष.

परवाच आला तो १५ दिवसांकरता, आज त्याला कळलं माझ्या रिझल्ट बद्दल. म्हणुन हे गुलाब घेऊन आला मला congratulate करायला. आणि 

त्यानी मला चक्क प्रपोज केलं!! म्हणजे पूर्वी तो इथे असताना माझा क्रश होताच त्याच्यावर. पण मला कधी वाटलं नव्हतं की आपलं त्याच्यावर प्रेम असलं तरी तो माझ्याकडे बघेल म्हणुन! मला म्हट्ला की अमेरीकेला मला पुढचं शिकता येईल.

आई-बाबांना सुद्धा तो पटला. त्यांनी पण लगेच हो सांगीतलं. येत्या रविवारी साखरपुडा आहे. त्याला लवकर 

परत जायचं आहे ना...म्हट्लं तुला येऊन आधी सांगते.

तुला पण कोणी आवडत असेल, तर तु मलाच पहिलं सांगशील ना?"


तो गप्प राहिला... नेहमी सारखा.. नुसतंच "हं" केलं..

तिचं लक्ष नव्हतंच नाहीतरी.. ती त्या गुलाबाकडेच बघत होती

Tuesday, April 10, 2012

प्रेमविवाह

मी यंदाच्या सुट्टीत माझ्या काकांच्या घरी गेलो होतो. त्याचं घर गावापासून थोडस दूर आहे. काकांचा दुधाचा व्यवसाय आहे, तिथेच त्यांच्या कडे काम करत असलेल्या मुलाची हि कथा आहे. 

त्या मुलाच एका मुलीवर खूप प्रेम होत आणि त्यामुलीच सुद्धा. दोघेही एकाच जातीचे होते पण दोघांच्याही घरातून त्यांच्या लग्नसाठी विरोध होता. ज्यादिवशी मुलीच्या घरच्यांना त्याच्या बद्दल कळाले तेव्हा त्यांनी त्या मुलाला खूप मार मार मारले आणि गावाच्या बाहेर नेवून फेकून दिले. मुलाच नशिब  चांगल म्हणून तो बिचारा कसाबसा त्यातून वाचला. त्याच्या घरच्यांनी त्याला दुसऱ्या एका लांब गावात आपल्या नातेवायकांकडे उपचारासाठी आणून ठेवले. दोन महिन्यात तो बरा झाला, पण त्याला तिच्याशीच लग्न  करायचं होत. 


त्याने तिला संपर्क केला आणि त्या दोघांच असे ठरले कि गावात त्या मुलाच्या मित्रांची मदत घेवून तिथून पळून जायचं. पण एक मोठी अडचण हि होती कि त्या मुलीला १८ वर्ष पूर्ण होण्यासाठी ३ महिने बाकी होते. त्या मुलाच्या मित्राने त्याला एक कल्पना सुचवली. तुम्ही इथून पळून जा, देवळात लग्न करा आणि तीन महिने मी सांगतो त्या ठिकाणी लपून राहा. माझ्या ओळखीच एक गृहस्थ आहेत ज्यांचा दूधाच व्यवसाय आहे आणि त्याचं घर सुद्धा गावापासून थोड लांब आहे. (ते म्हणजे माझे काका) तू त्यांच्या कडे नोकरी कर ते तुला माझ्या सांगण्यावर राहायला एखाध छोटास घर पण देतील आणि तुला नोकरी पण. 

ठरल्या प्रमाणे सर्व झाल देवळात लग्न करून त्या दोघांना त्याचा तो मित्र माझ्या काकांकडे घेवून आला. सर्व प्रकार सांगितला काकांनी राहायला घर आणि नोकरी पण दिली, ती मुलगी पण शिकलेली होती त्यामुळे तिनेही काकांच्या मुलाचा HOMEWORK घ्यायचं काम केल. पण त्यादिवशी प्रकरण काही वेगळाच वाटत होत. मी घरातून बाहेर बघितल तर तो मुलगा आणि ती मुलगी दोघ खूप टेन्शन मध्ये दिसत होती मुलगातर खूप घाबरला होता.  आणि ती मुलगी खाली मन घालून उभी होती. ते दोघ माझ्या काकांशी काही बोलत होते. 

काकांना विचारल्यावर मला कळाले कि मुलीच्या घरच्यांनी त्या मुला विरुद्ध तक्रार नोंदवली पोलीस स्टेशनमध्ये, पोलिसांनी तपास करत त्या मुलाचा शोध लावला ज्याने त्या दोघांना पळण्यात मदत करून काकांकडे आणून सोडले होते. त्याची कसून चौकशी केली त्याला खूप मारल पण तरीही त्या मुलाने आपले तोंड नाही उघडले. पोलीस त्याला सतत त्रास देतच होते. पण त्या मुलाच्या सासूला माहित होते कि आपल्या जावयाने त्या दोघांना कुठे लपवून ठेवलेय ते. पोलीस सारखे आपल्या जावयाला त्रास देतायत हे पाहून तिने पोलिसांना खर काय ते सांगून टाकले होते. ह्याच सर्व टेन्शन मुळे ते घाबरले होते. पोलीस कधीही तिथे पोचले असते. त्यामुळे काका आणि काकांचा मोठा मुलगा दोघाही विचारात पडले होते त्या मुलीला १८ पूर्ण व्हायला अजून एक महिना बाकी होता. अजून एकाच महिना कसातरी लपून राहायचा होता. तितक्यात काकांना एक मित्राच घर आठवले जे औरंगाबादला होते. काकांनी त्यांना सांगितले कि तुम्ही आताच्या आता तिकडे निघा मी माझ्या मित्राला फोन करून सांगतो. तो तुमची सर्व सोय करेल एक महिना तिथे थांबा मग मी तुमच लग्न लावून देयीन आणि मग इथेच राहा माझ्याकडे. 

पण ते दोघेही खूप घाबरले होते अजूनही. त्यांनी कपडे भरले ब्यागेत आणि मीच त्यांना सोडायला गेलो त्यांना ST पकडून स्टेशनला जायचे होते आणि तिथून रात्रीच्या ट्रेनने औरंगाबादला. मी त्यांना माझ्याकडून जमेल तितक धीर देण्याचा प्रयत्न केला निघताना. खूप समजावलं आणि अजिबात टेन्शन घेवू नका आम्ही सर्व तुमच्या बाजूने आहोत सांगितले आणि निरोप घेवून मी निघालो. मी घरी त्यांना सोडून संध्याकाळी घरी आलो....आम्ही सर्व त्यांच्या बद्दलच विचार करत बसलो होतो. नंतर रात्री जेवायच्या वेळेस आम्ही एकत्र जेवायला बसलो पण काका जेवायला नाही आले. म्हणाले मी नंतर बसतो तुम्ही जेवा. 

आमच जेवून झाल्या वर मी काकांकडे आलो जेवायला काकी बोलावते आहे हा निरोप घेवून पण पाहतो तर काका रडत होते मी सर्वांना बोलावले सर्वजण काकांना विचारात होते कि नक्की काय झालाय तुम्ही का रडत आहात. काका म्हणाले रेल्वे पोलीस स्टेशन  मधून फोन आला होता, एका झोडप्याने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केलीय. त्या मुलाच्या खिशात तुमच विझिटिंग कार्ड मिळाल, म्हणून कॉल केला जर तुम्ही ह्यांना ओळखत असाल तर लवकर स्टेशनला या. आम्ही सर्व सुन्न झालो काका काकी आणि सर्वच खूप रडत होतो. नंतर आम्ही स्टेशनला गेलो. प्रत्येक्षदर्शिने सांगितले कि ते रात्री ८ वाजल्या पासून प्लाटफार्म वर  बसले होते आणि एकमेकांच्या मिठीत सारखे रडत होते, आणि खूप घाबरलेले होते त्यांना औरंगाबादला जायचं असे तो मुलगा एकदा बोलला. पण अजून काही बोलत नव्हते ते दोघ. आणि नंतर अचानक काय झाले आणि एक फास्ट एक्स्प्रेसच्या समोर त्यांनी धावत जावून उडी मारली. आणि सर्व काही संपल. मला तर काहीच समजत नव्हते.....अजून काय करायला पाहिजे होते म्हणजे ते दोघ सुखी झाले असते. माझी खूप इच्चा होती कि त्यांचा सुखाच संसार व्हावा. पण नियतीला ते मान्य नव्हते. 

मूळ कथा - अलोक अकसे

Friday, April 06, 2012

Challenge

एकदा एक मुलगा त्याच्या प्रेयसीला Challenge करतो कि, 
"एक पूर्ण दिवस तू माझ्याशिवाय राहून दाखवायचे, मला फोन, मैल, मेसेज काहीही करायचे नाही,जर तू अस करून दाखविलेस तर मी तुझ्याशी लगेच लग्न करेन ........!!!"

मुलगी म्हणाली, 
"खरे तर मला एक क्षण सुद्धा तुझ्या शिवाय राहायचे नाहीये, पण तरीही आज तू मला Challenge केले आहेस म्हणून मी एक पूर्ण दिवस काहीही Contact न करण्याचे Challenge स्वीकारत आहे !"
 

एक पूर्ण दिवस काहीही contact न करता जातो.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ती मुलगी खूप उत्सुकतेने त्या मुलाला भेटायला त्याच्या घरी जाते. पण, घरात पोहोचताच ती तिच्या प्रियकराची पांढर्या-शुभ्र कापडात ठेवलेली व वरती हार घातलेली body बघते आणि तिला एकदम मोठा धक्का बसतो. तिला हे अस कस झाले ???, का झाले ????? काहीच कळत नव्हते... रडावे तर अश्रूंचा पूर येईल, शांत तर राहातच येत नव्हते... कंठ दाटून आलेला... सर्व आठवणी डोळ्यासमोर एक क्षणात उभ्या राहिल्या...

तेव्हड्यात त्याच्या आईने त्याने तिच्यासाठी लिहिलेली चिठ्ठी  तिच्याकडे दिली त्यात लिहिले होते, "कर्करोगाच्या आजरामुळे माझ्या कडे शेवटचा एकच दिवस राहिला होता म्हणून मला तुला Challenge करावे लागले... आणि तू ते करून दाखविलेस. आता फक्त हेच तुला रोज करायचे आहे... माझ्यासाठी...!!!"

Tuesday, April 03, 2012

आई तू का ग सोडून गेली मला...

आई तू का ग सोडून गेली मला ..
हे जग खूप वाईट आहे जगू देत नाही एकट्याला..
मला सतत तुझी आठवण येते एका एका क्षणाला..
कोणीच नाही ग तुज्या पिल्लाचे अश्रू पुसायला..
खूप खूप रडतो रात्री घेऊन उशीला.....
आई तू का ग सोडून गेली मला ..
ये न ग मला कुशीत कुशीत घ्यायला..
माझे बाळ खूप हुशार म्हणायला....
ये न ग मला घास भरवायला ..
एक घास चिऊ चा म्हणत खाऊ घालायला..



आई तू का ग सोडून गेली मला ..

कोणीच नाही इथे मला ओरडायला..
बाळा अभ्यास कर म्हणून सांगायला ..
कोणीच नाही इथे माझ्याशी खेळायला..
पाय दुखल्यावर दाबून द्यायला...



आई तू का ग सोडून गेली मला ..

न icecream खावसे वाटते ना हि केक
कोणीच नाही माझे लाड पुरवायला ...
कसे कसे होते ग रोज झोपताना..
कोणीच नाही पाठीवरून हात फिरवायला..


Monday, April 02, 2012

विदुषक

 रोज तो आपल्या चेहऱ्यावर make up करून एक मुखवटा चढवतो अन स्वतःचा तमाशा करून घ्यायला श्रोत्त्यांसमोर येतो... माणसं पण अगदी खुशीने पैसे मोजून त्या विदुषकाचा तमाशा होतांना पाहायला जातात ...

तो बिचारा वेडावाकडा नाचतो, पडतो-धडपडतो, उंचावरून खाली पडतो अन माणसं त्याच्या लाचारीवर मनभरून हसतात त्याला टाळ्या देतात... दुसऱ्याच्या लाचारीवर हसण्याची माणसांची ही जुनी सवय... तमाशा संपला की मग सगळे निघून जातात.... उरतात फक्त त्या रिकाम्या खुर्च्या ... पण विदुषकाला त्या जास्त जवळच्या वाटतात..
 
कारण त्या कमीतकमी त्याच्यावर हसत तर नाहीत.. मग तो विदुषक आपला मुखवटा उतरवतो आणि आपल्या घराकडे जायला निघतो.. पण तिथे त्याला दिसतात व्यावहारिक जगात राहणारे हे दुसरे विदुषक... लोकांनी आपला तमाशा पहावा यासाठी बंगला, गाडी, पैसा यासारख्या status symbols चा make up करणारे.. तेंव्हा त्याच्या मनात एकच विचार येतो...
 
यांना कधी कळेल की एकदा का तमाशा संपला अन हा make up उतरला की विदुषकाच सोंग घेणारा प्रत्येक जण एक सामान्य माणूस होतो... अन सामान्य माणसाला शक्यतो कोणी ओळखत नाही...
 

 
सर्कशितला विदुषक ...
by and for ; एक एकटा एकटाच...

Thursday, March 29, 2012

Mc' Donalds - Puneri Branch


'पुणेरी पाट्या' संस्कृतीचे आक्रमण 
'मॅकडोनाल्ड्स' वर झाले तर? 
  • आमचे येथे बर्गर मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.
  • शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.
  • दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.
  • कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठी बसायची सोय.
  • टिव्ही चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत
  • टिव्ही चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.
  • कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. लहान साईज: १९ फ्राईज,
    मध्यम
    : २७ फ्राईज, मोठा: ४६ फ्राईज
  • गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. व्यवसायाच्या वेळा : ११ ते ते . तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५
  • पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर.. पुढच्या दहा मिंटात मिळेल ! पैसे परत मिळणार नाहीत.
  • कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.
  • विनाकारण सॉस मागू नये. टोमेटो फुकट येत नाहीत.
  • शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
  • दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.
  • उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.
  • हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत
    (
    ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये - हुकूमावरून)
  • आमची कुठेही शाखा आहे !
    (
    पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)
  • कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत

Read This Heart Touching Stories